तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व महापालिका आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तक्रार येण्याची वाट न पाहता यादीतील चुका स्वतःहून शोधून दुरुस्त करा, दुबार मतदारांची नावे काळजीपूर्वक तपासा आणि मतदानाच्या दिवशीही याबाबत दक्ष राहा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.


गुरुवारी सर्व महापालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन वाघमारे यांनी हे निर्देश दिले. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले की, दुबार नाव असलेला मतदार एकदा मतदान केंद्र निवडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मतदान करू शकणार नाही. यामुळे निवडणुकीत गोंधळ आणि गैरप्रकार टाळता येतील.


दरम्यान, सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेची मूळ मतदारयादीच वापरली जाते. फक्त तिचे प्रभागनिहाय विभाजन केले जाते. त्यात मतदारांचे नाव-पत्ता बदलले जात नाहीत. यंदा दि. १ जुलै २०२५ ही पात्रतेची तारीख (क्वालिफायिंग डेट) निश्चित करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


आता दहा डिसेंबरला येणार अंतिम यादी


- प्रारूप मतदारयादीवर आलेल्या हरकती आणि सूचनांची तातडीने पडताळणी करून १० डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करावी.
- दुबार नावांचा कसून शोध घ्यावा. अशी नावे महापालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि वेबसाइटवर जाहीर करावीत.
- ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी (**) चिन्हासह दिसत आहेत, त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारावे आणि अर्ज भरून घ्यावा.
- अर्ज केले नाही तर मतदानाच्या दिवशी मतदाराकडून हमीपत्र लिहून घेऊन, ओळख पडताळल्यानंतरच मतदानाची परवानगी द्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी