नवी मुंबईत ११ महिन्यांत ३४९ मुली बेपत्ता !

नवी मुंबई : नवी मुंबईतून १ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४९९ मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. यात ३४९ मुली व १५० मुले आहेत. ४५८ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ४१ जणं अद्यापही असुरक्षित आहेत. त्यात ३४ मुलींचा समावेश आहे. वाढलेल्या प्रकरणांमुळे मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. या बेपत्ता मुलींमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण जास्त आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोशल मिडीया, कुटुंबातील विसंवाद ही यामागील कारणे असल्याचे मत व्यक्त होत आहे.


अनेक केसेसमध्ये मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर ४१ मुला-मुलींचा अध्याप शोध लागलेला नाही. यातील २५ गुन्हे पोक्सो अंतर्गत नोंद झालेले आहेत त्यामुळे ही प्रकरणे गंभीर मानली जातात. पालकांसाठी पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. मुलांच्या वागणुकीत बदल, त्यांचे ऑनलाईन राहणे, अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री याकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलीस करतात. याबद्दल विविध शाळा-­महाविद्यालयांमध्येही जनजागृती केली जात असल्याची माहिती व.पो.नि.पृथ्वीराज घोरपडे, मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष यांनी दिली.


१ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या काळात येथील विविध पोलिस ठाण्यांतून बेपत्ता मुला-मुलींच्या नोंदींमध्ये सर्वाधिक आकडे तुर्भे पोलीस ठाण्यातील (५१) आहेत. त्यापाठोपाठ रबाळे (४९), रबाळे एमआयडीसी (४१), पनवेल शहर (३९), खारघर (३३), तळोजा (३१), कोपरखैरणे (३२), एनआरआय (३०) यांशिवाय कामोठे (२२), खांदेश्वर (२०), नेरुळ (१८), एपीएमसी (१९) या भागांसह इतर भागातीही लक्षणीय प्रकरणे नोंदली गेली आहेत.

Comments
Add Comment

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

बंदी असलेल्या गांजा आणि चायनीज मांजाची पुण्यात राजरोस विक्री

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आणि त्यांच्या आसपासच्या भागात बंदी असलेल्या गांजा या

शरद पवारांच्या पक्षाला भगदाड, शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा

पुणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान