नवी मुंबईत ११ महिन्यांत ३४९ मुली बेपत्ता !

नवी मुंबई : नवी मुंबईतून १ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४९९ मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. यात ३४९ मुली व १५० मुले आहेत. ४५८ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ४१ जणं अद्यापही असुरक्षित आहेत. त्यात ३४ मुलींचा समावेश आहे. वाढलेल्या प्रकरणांमुळे मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. या बेपत्ता मुलींमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण जास्त आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोशल मिडीया, कुटुंबातील विसंवाद ही यामागील कारणे असल्याचे मत व्यक्त होत आहे.


अनेक केसेसमध्ये मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर ४१ मुला-मुलींचा अध्याप शोध लागलेला नाही. यातील २५ गुन्हे पोक्सो अंतर्गत नोंद झालेले आहेत त्यामुळे ही प्रकरणे गंभीर मानली जातात. पालकांसाठी पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. मुलांच्या वागणुकीत बदल, त्यांचे ऑनलाईन राहणे, अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री याकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलीस करतात. याबद्दल विविध शाळा-­महाविद्यालयांमध्येही जनजागृती केली जात असल्याची माहिती व.पो.नि.पृथ्वीराज घोरपडे, मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष यांनी दिली.


१ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या काळात येथील विविध पोलिस ठाण्यांतून बेपत्ता मुला-मुलींच्या नोंदींमध्ये सर्वाधिक आकडे तुर्भे पोलीस ठाण्यातील (५१) आहेत. त्यापाठोपाठ रबाळे (४९), रबाळे एमआयडीसी (४१), पनवेल शहर (३९), खारघर (३३), तळोजा (३१), कोपरखैरणे (३२), एनआरआय (३०) यांशिवाय कामोठे (२२), खांदेश्वर (२०), नेरुळ (१८), एपीएमसी (१९) या भागांसह इतर भागातीही लक्षणीय प्रकरणे नोंदली गेली आहेत.

Comments
Add Comment

राज्यसभा हुकलेल्या राहुल शेवाळेंवर लवकरच मोठी जबाबदारी?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी देऊन ‘धक्कातंत्र’ वापरल्याने नाराज

इराणकडून सौदीच्या यानबू बंदरातील समरेफ रिफायनरीवर हवाई हल्ला; जागतिक तेल बाजारात खळबळ

सौदी अरेबियाच्या लाल समुद्र किनाऱ्यावर असलेल्या यानबू बंदरगाहातील सौदी अरामको आणि एक्सॉनमोबिल यांच्या

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली