धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर नऊ दिवसांनी कुटुंबाने हा विधी पार पाडला.


बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेता धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले. ते मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पोकळी निर्माण झाली.


धर्मेंद्र यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे अंतिम संस्कार शांततेत करण्यात आले. यानंतर बुधवार ३ डिसेंबर २०२५ रोजी धर्मेंद्र यांच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जित करण्यासाठी आणल्या. अस्थींचे गंगेत विसर्जन करून त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. सर्व विधी करताना धर्मेंद्र यांचे दोन्ही मुलगे म्हणजेच सनी आणि बॉबी उपस्थित होते .


पुजाऱ्यांच्या हस्ते सर्व विधी करण्यात आले, धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने विधींसाठी खासगी हॉटेल निवडले होते . अंतिम विधी सगळ्या माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी कुटुंबाने विशेष काळजी घेतली होती. बुधवारी, सकाळी 11 वाजताच्या कुटुंब हरिद्वारच्या श्रवणनाथ नगर परिसरातील पिलीभीत हाऊस घाटावर पोहोचले आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनुसार अस्थींचे गंगेत विसर्जन केले.


कुटुंबाला शांत पद्धतीने त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणालाही न कळता, त्यांनी धर्मेंद्र यांच्या अंतिम विधी केल्या. तसेच घाटाच्या चारीबाजूला सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. विसर्जनानंतर देओल परिवार लगेचच मुंबईला येण्यासाठी रवाना झाले .

Comments
Add Comment

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद

एकता कपूर : एकता कपूरचा सलमान खानला सडेतोड टोला ? म्हणाली- "जेव्हा तुमचा प्रतिस्पर्धी प्रत्येक भागात..."

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) यांच्यात सोशल मीडियावर एक

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'ची तारीख ठरली! सलमान खानची 'करण-अर्जुन' शैलीत एंट्री; कुठे आणि कधीपासून पाहायला मिळणार शो?

मुंबई : सर्वात लोकप्रिय आणि चर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) आपल्या २० व्या वर्षात पदार्पण करत असून, या ऐतिहासिक

Sunny Deol Batwara 1947 : 'बटवारा १९४७' च्या प्रदर्शनाआधी सनी देओल नतमस्तक; मुलगा करणसोबत घेतले गुरु गोविंद सिंग यांचे आशीर्वाद!

पटना : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बटवारा १९४७' (Batwara 1947) मुळे सध्या

Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना