निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. सुरुवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची योजना होती. मात्र, काही न्यायालयीन खटल्यांमुळे २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. याचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेवर होऊ शकतो.


निकालादिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट 'ब' संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित केलेली आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेमुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त राहणार असल्याने परीक्षा सुरळीत पार पडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण एकाच दिवशी शासनाचे दोन उपक्रम असल्याने परीक्षा केंद्रांची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कर्मचारी उपलब्धता आणि वाहतूक यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



राज्यातील लाखो विद्यार्थी महाराष्ट्र राज्य आयोगाच्या गट 'ब' परीक्षेला बसणार आहेत. सातारा, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, बीड, धाराशिव, वर्धा, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या सर्वच जिल्ह्यांमध्ये नगरपालिका असल्याने येथील निकाल प्रक्रियेत प्रशासन मोठ्या प्रमाणात व्यस्त असणार आहे. त्यामुळे प्रशासनाला परीक्षा आयोजित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून परीक्षेसाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.



महत्त्वाचे म्हणजे परीक्षेला २० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने आयोगाने सर्व तयारी केली असून परीक्षा केंद्रांबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. मात्र, निवडणूक निकालाच्या दिवशीच परीक्षा असल्याने, जर जिल्हा प्रशासनाने परीक्षा घेण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले, तर आयोग त्यावर निर्णय घेऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुढील दोन दिवसांत प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर आयोगाचे अधिकारी आणि सदस्यांची बैठक होऊन यावर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. जर परीक्षा नियोजनात कोणतीही अडचण येणार नसेल तर ही परीक्षा वेळापत्रकानुसार २१ डिसेंबरलाच होणार आहे.


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह