Satara Accident : काळाचा घाला! कराडजवळ नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहल बस २० फूट दरीत कोसळली; ५ जणांची प्रकृती गंभीर, २० जखमी!

सातारा : पुणे-बेंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळच्या कराड परिसरात सोमवारी सकाळी एक मोठी आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस वाठार गावच्या हद्दीत तब्बल २० फूट खोल दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. बस दरीत कोसळल्याने अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीतून जखमींना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.



५ विद्यार्थी गंभीर, १५ हून अधिक जखमी


बस दरीत कोसळताच झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खोल दरीत कोसळलेल्या बसमधून विद्यार्थी व शिक्षकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी थरारक प्रयत्न केले. अपघातानंतर समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. पंधरापेक्षा अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना तातडीने उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या तत्पर मदतीमुळे अनेक जखमींना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घटनास्थळी कराड पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून अपघाताचे कारण नेमके काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सहलीचा आनंद घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर क्षणात संकट कोसळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार