पर्सनल फायनान्स: चार वर्षांत करोडपती बनणे शक्य? तर किती दरमहा गुंतवावे लागतील वाचा....

मोहित सोमण: योग्य गुंतवणूक व गुंतवणूकीचे विविधीकरण माणसाला केवळ सक्षम नाही तर बाजारातील जोखीम आपल्यापासून दूर राखण्याची परवानगी देते. ४ ते ५ वर्षात करोडपती होणे शक्य आहे का? पाहूयात....


जर महिन्यात २०००० रूपयांची बचत केल्यास १२ महिन्यात ती रक्कम २४०००० रूपये होते.जर आपण त्यामध्ये १२% परतावा (Returns) पकडल्यास एकूण एसआयपी रक्कम वर्षाला २८८०००० होते.


आता हा कॉर्पस चार वर्षांचा पकडल्यास एकूण रक्कम २८८०००० रूपये ×४ वर्ष = ११५२०००० कोटी रूपये होतात. अर्थात आपण त्यात इतर खर्च (म्युच्युअल फंडातील कमिशन व इतर प्रोविजनल रक्कम पकडल्यास १००००० लाख रूपये वगळून ११४२०००० कोटी रुपये पकडूयात.....


आता एसआयपी गुंतवणूकीशिवाय एकत्रित एक लाख रूपयांची गुंतवणूक वगळता इतर खर्च बाजारात अस्थिरता, अचानक बाजारात घसरणीचा कौल, कंटीजंसी रक्कम अशा रक्कमा वगळून आणखी १ लाख (१००००० रूपये) वगळूयात त्यामुळे आता आधीची प्रोविजनल १ लाख अधिक आताची १ लाख बघता ११५२०००० कोटी रुपयांतून वगळता एकूण रक्कम ११३२०००० रूपयांची गुंतवणूक असेल. आता यामध्ये एकत्रित (Lumpsum) रक्कम १०००० लाख रूपये पकडूयात यात इतर खर्च, प्रोव्हिजनल खर्च, टॅक्स, इतर खर्च वगळता ८०००० रूपये पकडूयात आता ८०००० रूपयांवर ८% एनएव्ही (Net Asset Value) सह ती रक्कम १५००० रूपये पकडूयात म्हणजेच १५०००×४


म्हणजेच १ वर्षासाठी ही गुंतवणूक रक्कम ११४२०००० अधिक ९५००० रूपये म्हणजेच १ कोटी पंधरा लाख पंधरा हजार (११५१५०००) रूपये होणार आहे. किंवा इतर रक्कम चार वर्षांची पाहिल्यास ११४२००००+ ३८०००० रूपये ११८००००० रुपये गुंतवणूकदारांना मिळू शकतात. याशिवाय जर पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक, एफडीतील गुंतवणूक, बँकेच्या व्याजदरात मिळणारा परतावा व ईटीएफमध्ये ४ वर्षात एकूण ५% परतावा पकडल्यास (वर्षाला ५०००० पकडल्यास) २ लाख रूपये मिळू शकतात त्यामुळे एकूणच रक्कम ११४२००००+ ३८०००० + (५००००×४) रूपये म्हणजेच २००००० पकडल्यास १ कोटी २० लाख रूपये कमावू शकतो (१२०००००) रूपये मिळाल्यास ४ वर्षात करोडपती बनवण्याची शक्यता आपल्याला निर्माण करता येते. परंतु प्रातिनिधिक दृष्ट्या हे चित्र निर्माण झाले असले तरी भूराजकीय, घरगुती शेअर बाजारात, अर्थव्यवस्थेत अस्थिरता व इतर अडचणीही येऊ शकतात. त्यामुळे आपण एकूण १ कोटी २० लाखांची गुंतवणूक मिळवण्यासाठी प्रथम ५ लाख कमी पकडूयात


म्हणजेच प्रस्तावित रक्कम ७०००००० रूपये होऊ शकते. त्यामुळे शिल्लक रक्कम ४८ महिने पकडल्यास एकूण शिल्लक रक्कम १४५८३ रुपये होते. २०००० रूपयांची गुंतवणूक केल्यास त्यामुळे वरील तूट अंदाचे ६००० रुपयांची पकडूयात. त्यामुळे केवळ एसआयपीसाठी रक्कम धरल्यास २०००० अधिक ६०००= २६००० रूपयांची एसआयपी गुंतवणूक आवश्यक आहे. तसेच इतर गुंतवणूक वर्षाला १ लाख पकडल्यास ८३३३ म्हणजेच अंदाजे ८३३५ रूपयांची आवश्यक असेल.


त्यामुळे ४ वर्षात करोडपती एकूण गुंतवणूक ३४३३५ पकडल्यास अंदाजे ३५००० रूपयांची गुंतवणूक करणे किमान आवश्यक आहे.


(टीप- हा एक केवळ अंदाज असून कुठलीही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. झालेल्या नुकसानीसाठी प्रकाशक व लेखक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती)

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास