निवडणुक अपडेट: राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मात्र निकाल कधी लागणार?

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या २६४ जागांवर आज होणाऱ्या मतदानात अनेकांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. ज्याचा निकाल उद्या म्हणजेच ३ डिसेंबरला लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केले आहे. मात्र ऐन मतदानाच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाने जाहिर केल्याप्रमाणे आज मतदान होत असले तरी निकालासाठी अजून १९ दिवसांची वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती या अपडेटमधून समोर येत आहे.


निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासून अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठाकडे विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेतला घोळ समोर आल्यानंतर राज्यात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकींमधील काही नगर परिषदा आणि नगर पंचायतीचे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. उर्वरित ठिकाणी जाहिर केल्याप्रमाणे आजच मतदान पार पडत आहे.




ज्या ठिकाणचे मतदान पुढे ढकलले आहे, तिथे २० डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या सर्वच ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्रित लावता येईल का? अशी महत्त्वपूर्ण मागणी औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निवडणूक आयोग खंडपीठाकडे देणार आहे. त्यामुळे आज मतदान होत असले तरी याचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न पडला आहे.

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली