गोंदिया जिल्ह्यात बिबट्याचा कहर; शेतात गेलेल्या ९ वर्षीय रुचीचा उपचारादरम्यान मृत्यू

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे लोकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे वडिलांसोबत शेतात गेलेल्या ९ वर्षीय मुलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बालिकेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.


मृत मुलीचे नाव रुची देवानंद पारधी (वय ९ ) असे असून ती गुरुवारी सकाळी वडिलांसोबत शेतावर गेली होती. वडील तारांचे कुंपण लावत असताना रुची शेताच्या बांधावर उभी होती. यावेळी जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला आणि तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच वडील आणि आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने रुचीला सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले.


गंभीर जखमी रुचीला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गोंदिया येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री आठच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.


दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील दोडके जंगल भागात ७२ वर्षीय कन्सु हन्नु उईके यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. या मृत्यूमागे हिंस्त्र प्राण्याचा हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. २८ नोव्हेंबर रोजी ते सरपणासाठी जंगलात गेले होते, परंतु घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. गावापासून सुमारे एक किलोमीटरवर त्यांचा मृतदेह आढळला. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गोरेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे