IMD Weather Update : हाय अलर्ट जारी! 'डिटवाह' चक्रीवादळामुळे पुढील ४८ तास धोक्याचे; अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

यंदा देशासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या अतिरिक्त पावसामुळे अनेक राज्यांना मोठा फटका बसला आणि मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रालाही यावर्षी मान्सूनचा चांगलाच तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला. नद्यांना आलेल्या या पुरामुळे ग्रामीण भागामध्ये मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरं वाहून गेल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला, तसेच पिकांचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला. दरम्यान, आता अनेक राज्यांमध्ये हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. मात्र, थंडी सुरू असतानाच एक मोठी आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. 'डिटवाह' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा 'हाय अलर्ट' जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील किनारपट्टीवर आणि आसपासच्या राज्यांमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी होण्याची भीती व्यक्त होत आहे.



पुढील ४८ तास केरळसह अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज


श्रीलंकेमध्ये मोठा धुमाकूळ घातलेल्या 'डिटवाह' चक्रीवादळामुळे (Cyclone Ditwah) आता भारताच्या दक्षिण आणि किनारी राज्यांमध्येही मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांमध्ये या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जोरदार पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असलेल्या राज्यांची यादी IMD ने जाहीर केली आहे. केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळसोबतच तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुचेरी आणि अंदमान व निकोबार बेटे या ठिकाणी देखील अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळ किनारपट्टीकडे सरकत असल्याने पुढील दोन दिवस (४८ तास) हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.



श्रीलंकेत डिटवाहाच्या चक्रीवादळामुळे शेकडो जणांचा मृत्यू, आता भारताकडे धोका


श्रीलंकेत 'डिटवाह' चक्रीवादळामुळे (Cyclone Ditwah) मोठे संकट उभे राहिले असून, या चक्रीवादळाचा देशाला मोठा तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेमध्ये प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे देशात शेकडो जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा सध्या शोध घेतला जात असल्याने, मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. श्रीलंकेच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, श्रीलंकेत विध्वंस केल्यानंतर आता हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या संदर्भात इशारा दिला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ ते ४८ तासांमध्ये भारतात हवेचा वेग प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. किनारी भागांमध्ये प्रति तास ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे भारत सरकार आणि किनारपट्टीवरील राज्यांमध्ये सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.



महाराष्ट्राची स्थिती काय?


डिटवाह चक्रीवादळ दक्षिण भारताच्या दिशेने सरकत असले तरी, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अनेक भागांमध्ये पुढील दोन दिवस हवामानात बदल जाणवणार आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण (Cloudy Weather) कायम राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याउलट, विदर्भाचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्रात मात्र थंडीचा कडाका (Severe Cold) वाढणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ढगाळ वातावरण आणि वाऱ्याच्या बदलांमुळे राज्यातील बहुतांश भागांत तापमानात घट होऊन थंडीत वाढ होईल.

Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक