पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावपळ, कॉल करणारा जेरबंद

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. हॉटेलच्या लँडलाईनवर आलेल्या फोनवर "हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा" अशी धमकी देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ हॉटेलवर दाखल झाले.


हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने हा कॉल ‘फेक’ असल्याचे स्पष्ट झाले. अचानक झालेल्या या गोंधळानंतर हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा कॉल एका मोबाईल क्रमांकावरून करण्यात आला होता. प्राथमिक तपासानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणी हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ९८३२२५२५१७ या मोबाईल क्रमांकावरून धमकी दिल्याचे नमूद केले आहे. खोडसाळ पद्धतीने केलेला हा प्रकार कोणत्या हेतूने करण्यात आला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०