पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावपळ, कॉल करणारा जेरबंद

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. हॉटेलच्या लँडलाईनवर आलेल्या फोनवर "हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा" अशी धमकी देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ हॉटेलवर दाखल झाले.


हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने हा कॉल ‘फेक’ असल्याचे स्पष्ट झाले. अचानक झालेल्या या गोंधळानंतर हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा कॉल एका मोबाईल क्रमांकावरून करण्यात आला होता. प्राथमिक तपासानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणी हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ९८३२२५२५१७ या मोबाईल क्रमांकावरून धमकी दिल्याचे नमूद केले आहे. खोडसाळ पद्धतीने केलेला हा प्रकार कोणत्या हेतूने करण्यात आला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच