New Aadhaar Card : आधार कार्डचा गैरवापर थांबणार! आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card; जुन्या कार्डापेक्षा किती वेगळं आणि सुरक्षित?

मुंबई : सध्या बँक असो, महाविद्यालय असो किंवा इतर कोणतेही शासकीय काम; ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आधार कार्डमध्ये असलेली व्यक्तीची जन्म तारीख, पत्ता, वडिलांचे नाव आणि इतर माहिती अत्यंत गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. आधार कार्डचा होणारा गैरवापर (Misuse) आणि दुरुपयोग थांबवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) एक मोठा बदल करत आहे. UIDAI चे प्रमुख भुवनेश कुमार यांनी एका ऑनलाईन परिषदेत या महत्त्वपूर्ण बदलांविषयी भाष्य केले आहे. नवीन नियमांनुसार, आता आधार कार्ड अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह (Security Features) येणार आहे. या आधार कार्डवर व्यक्तीचा फोटो आणि एक खास QR कोड (Quick Response Code) दिलेला असेल. येत्या डिसेंबर महिन्यापासून हे नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे आधार कार्डची सत्यता तपासणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे, ज्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी पत्ता प्रमाणित करणे आणि व्यक्तीची ओळख पटवणे अधिक सुरक्षित होईल.



UIDAI चे नवीन नियम


ओळखीचा महत्त्वाचा पुरावा असलेल्या आधार कार्डाचा गैरवापर थांबवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) एक मोठा आणि ऐतिहासिक बदल करत आहे. नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे नवीन नियम लवकरच लागू होणार आहेत. सध्या आधार कार्डमधील १२ अंकी क्रमांक आपली माहिती दर्शवतो. जर कोणी या कार्डचा फोटो घेतला आणि या अंकांच्या आधारे दुरुपयोग केला, तर नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो. नागरिकांची माहिती सुरक्षित राहावी यासाठी नवीन नियमांनुसार, आता आधार कार्डमध्ये केवळ एक फोटो आणि क्यूआर कोड (QR Code) देण्यात येणार आहे. या नवीन नियमानुसार, ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी (Offline Verification) कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला आधार संख्या (Aadhaar Number) आणि बायोमॅट्रिकची (Biometric) माहिती जतन करण्याची (Store) परवानगी नसेल. हा नागरिकांच्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी (Security) आणि गोपनीयतेसाठी (Privacy) UIDAI ने घेतलेला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे आधार कार्डावर आधारित फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.



नवीन आधार कार्डमध्ये 'हे' बदल दिसणार


नवीन आधार कार्डवर आता केवळ फोटो आणि QR कोड दिसेल


नाव, पत्ता, जन्मतारीख आणि १२ अंकांचा आधार कार्ड क्रमांक दिसणार नाही


संबंधित QR कार्डमध्ये सर्व माहिती सुरक्षित जतन असेल


ऑफलाईन व्हेरिफिकेशन अधिक सोपं असेल आणि डेटा चोरीस आळा बसेल



लवकरच UIDAI चं नवीन ॲप लॉन्च होणार


आधार कार्डाच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी UIDAI आता नवीन मोबाईल ॲप (New Mobile App) सुद्धा लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे आगामी मोबाईल ॲप सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेऊन डिझाइन केलेले असेल. या ॲपमध्ये QR कोड स्कॅनिंग आणि फेसियल रिकॉग्निशन (Facial Recognition) सारख्या आधुनिक आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असतील. डिसेंबर महिन्यात लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, आधार कार्डचे ऑफलाईन व्हेरिफिकेशन (Offline Verification) कमी करण्याची तयारी करण्यात येत आहे. खासकरून, हॉटेल (Hotel) बुकिंग किंवा एखाद्या कार्यक्रमात प्रवेश करताना जेव्हा आधार कार्ड मागितले जाते, तेव्हा डेटा लिक (Data Leak) होण्याची भीती कायम असते. नवीन ॲपमुळे ऑनलाईन व्हेरिफिकेशन प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यक्तीची माहिती पूर्णपणे गोपनीय राहील. नागरिकांची गोपनीयता जपण्याच्या दृष्टीने UIDAI चा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,