एमएमसीचा प्रवक्ता विकास नागपुरे उर्फ ​​अनंत आणि ११ नक्षलवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण, नक्षलवाद समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

गोंदिया: महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून नक्षल संघटनेमधून आत्मसमर्पणाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नक्षलवादी संघटनेच्या महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ (एमएमसी) चा विशेष विभागीय समिती सदस्य आणि प्रवक्ता विकास नागपुरे ऊर्फ अनंतसह ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) गोंदिया पोलिसांसमोर या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र शासनाचे एकूण ८९ लाख रुपयांचे बक्षीस होते.


महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ अर्थात 'एमएमसी' या नक्षलवादी संघटनेचा प्रवक्ता अनंतने २७ नोव्हेंबरला प्रसिद्धी पत्रक जारी करत १ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण समिती आत्मसमर्पण करणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी अनंतसह ११ नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर शरणागती पत्करली. नक्षलवादाविरोधात हे खूप मोठे यश मानावे लागेल.


प्रसिद्धी पत्रकात अनंत याने सांगितले की, समितीतील इतर सदस्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी १ जानेवारी २०२६ पर्यंत वेळ हवा आहे. भूपती आणि चंद्रन्ना यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी शस्त्रे खाली ठेवल्याने आत्मसमर्पणाशिवाय पर्याय शिल्लक नाही. १ जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शस्त्रे खाली ठेवण्यात येतील. तसेच, या काळात कोणतीही हिंसा किंवा पीएलजीए सप्ताह पाळला जाणार नाही, असे आश्वासनही त्याने दिले.


नक्षलवादी संघटनेत दंडकारण्य आणि एमएमसी समितीचे मोठे महत्त्व आहे. एमएमसीमधील भूपती आणि चंद्रन्ना या मोठ्या नेत्यांनी शस्त्रे खाली ठेवल्यामुळे हळूहळू सर्वजण आत्मसमर्पणाकडे वळले आहे. त्यात ११ माओवाद्यांचे एकत्रिक आत्मसमर्पण आणि अनंतने सांगितलेले संपूर्ण एमएमसी संघटनेची लवकरच होणारी शरणागती हे नक्षलवाद समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील