एमएमसीचा प्रवक्ता विकास नागपुरे उर्फ ​​अनंत आणि ११ नक्षलवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण, नक्षलवाद समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

गोंदिया: महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून नक्षल संघटनेमधून आत्मसमर्पणाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नक्षलवादी संघटनेच्या महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ (एमएमसी) चा विशेष विभागीय समिती सदस्य आणि प्रवक्ता विकास नागपुरे ऊर्फ अनंतसह ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) गोंदिया पोलिसांसमोर या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र शासनाचे एकूण ८९ लाख रुपयांचे बक्षीस होते.


महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ अर्थात 'एमएमसी' या नक्षलवादी संघटनेचा प्रवक्ता अनंतने २७ नोव्हेंबरला प्रसिद्धी पत्रक जारी करत १ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण समिती आत्मसमर्पण करणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी अनंतसह ११ नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर शरणागती पत्करली. नक्षलवादाविरोधात हे खूप मोठे यश मानावे लागेल.


प्रसिद्धी पत्रकात अनंत याने सांगितले की, समितीतील इतर सदस्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी १ जानेवारी २०२६ पर्यंत वेळ हवा आहे. भूपती आणि चंद्रन्ना यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी शस्त्रे खाली ठेवल्याने आत्मसमर्पणाशिवाय पर्याय शिल्लक नाही. १ जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शस्त्रे खाली ठेवण्यात येतील. तसेच, या काळात कोणतीही हिंसा किंवा पीएलजीए सप्ताह पाळला जाणार नाही, असे आश्वासनही त्याने दिले.


नक्षलवादी संघटनेत दंडकारण्य आणि एमएमसी समितीचे मोठे महत्त्व आहे. एमएमसीमधील भूपती आणि चंद्रन्ना या मोठ्या नेत्यांनी शस्त्रे खाली ठेवल्यामुळे हळूहळू सर्वजण आत्मसमर्पणाकडे वळले आहे. त्यात ११ माओवाद्यांचे एकत्रिक आत्मसमर्पण आणि अनंतने सांगितलेले संपूर्ण एमएमसी संघटनेची लवकरच होणारी शरणागती हे नक्षलवाद समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.


Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे