वायुप्रदूषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी उपाययोजनांची सक्ती अनिवार्य

मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश


एक्यूआय सुधारण्यापर्यंत नागरिकांना रेल्वे स्थानक, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क देण्याबाबत सूचना


मुंबई : शहरातील दिवसेंदिवस वाढते वायुप्रदूषण कमी करण्यासाठी व हवेचा दर्जा सुधारण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) उदासीन असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील सर्व बांधकाम साइट्सवर प्रदूषण दर्शक यंत्रणा, धूळ बाहेर उडू नये यासाठी उंच पत्रे उभारणे केवळ बंधनकारक करून उपयोग नाही. तर त्यांची अंमलबजावणी होतेय की नाही?, याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत यासाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश देत न्यायालयाने सुनावणी १५ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. एक्यूआय सुधारेपर्यंत लोकांना रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे व इतर सार्वजनिक ठिकाणी मास्क देण्याबाबत विचार करावा, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.


या समितीत अमायकस क्युरींच्या कार्यालयातील व्यक्तींसह मुंबई महापालिका, एमपीसीबी आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील एका व्यक्तीचा समावेश असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ही समिती सर्वात खराब एअर क्वालिटी इंडेस्क असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करेल. त्या ठिकाणी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होतेय की नाही, याची चाचपणी करून पुढील सुनावणीत आपला अहवाल सादर करेल, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशातून स्पष्ट केले आहे. मुंबई शहर व उपनगरात वाढत्या प्रदूषणामुळे आजारी पडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.


बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मापन यंत्रणा


मुंबईतील हवेचा दर्जा प्रदूषणामुळे घसरला असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली.


नियमांची कठोर अंमलबजावणी आवश्यक


बांधकामाच्या ठिकाणी घालून दिलेल्या नियमांची संबंधितांनी पूर्तात न केल्यास ते बांधकाम थांबवण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, ही कारवाई करताना आर्थिक नुकसानीच्या मुद्द्याचाही विचार केला पाहिजे, असे मत मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केले. यासाठी सर्व बांधकामांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) असणे आवश्यक आहे, असे आदेश उच्च न्यायालयाने गेल्याच सुनावणीत दिले होते.

Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी