महाराष्ट्रात २ डिसेंबरला सुट्टी; नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून या दिवशी अधिकृत सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. निवडणूक असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये हा आदेश लागू राहणार आहे. मतदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय मतदान करता यावे, यासाठी सरकारने ही महत्त्वाची घोषणा केली आहे.
शुक्रवारी जारी झालेल्या शासकीय निर्णयानुसार (GR), ज्या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मतदान होईल, त्या ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांना सवेतन सुट्टीचा हक्क प्राप्त असेल.


पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतांची निवडणूक


राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका परिषद आणि ४२ नगर पंचायतांमध्ये मतदान होणार आहे. उद्योग, ऊर्जा आणि श्रम विभागांनी सांगितले की, प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


सवेतन सुट्टी न दिल्यास कारवाईची तरतूद


सरकारने स्पष्ट केले की मागील निवडणुकांत काही विभागांनी सवेतन सुट्टी न दिल्याने अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले होते. जनप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ नुसार मतदानाच्या दिवशी सवेतन सुट्टी देणे बंधनकारक आहे, याचीही आठवण सरकारी आदेशात करून देण्यात आली.


आवश्यक सेवांसाठी २ ते ३ तासांची विशेष सुट्टी


मतदान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व श्रमिक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हा नियम लागू होणार आहे, मग त्यांचे कार्यस्थळ मतदान क्षेत्रात असो वा बाहेर. उद्योग, हॉटेल, दुकाने, आयटी कंपन्या, मॉल, किरकोळ व्यवसाय यांसह श्रम विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रतिष्ठानांनी या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.जर कोणत्या संस्थेला दिवसभर सुट्टी देणे शक्य नसेल तर किमान २ ते ३ तासांची खास सुट्टी देणे बंधनकारक असेल. नियमांचे पालन न केल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे.


पहिल्या टप्प्यानंतर होणार मोठ्या निवडणुका


सरकारी आदेशात २ डिसेंबरला मतदान होणाऱ्या सर्व नगरपालिका आणि नगर पंचायतांची यादी दिली आहे. पहिल्या टप्प्यानंतर ३३६ पंचायत समित्या, ३२ जिल्हा परिषद आणि मुंबईसह २९ नगरपालिकांच्या निवडणुकांचा पुढील टप्पा पार पडणार आहे.

Comments
Add Comment

Solapur Accident: पिकअप गाडी विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; परिसरात खळबळ!

सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा

The honor of the palanquin : पालखी रथ आणि चौघडागाडीचा मान पुन्हा संस्थानच्या बैलजोड्यांना

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी रथ ओढण्याचा तसेच चौघडागाडीचा मान यंदाही श्री संत

जून महिना अर्धा संपला तरीही उन्हाचे चटके कायम

लातूर : जून महिना अर्धा संपत आला असताना लातूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका कायम आहे. मान्सूनच्या आगमनाकडे

Pune : धरणांतील जलसाठ्यात घट, पाणी जपून वापरण्याचे निर्देश

राज्‍यातील अपु-या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍ट

Pan Masala Sumggling: शेगावात मध्यरात्री ७० लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Buldhana : पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई

Akola Murder Case: धक्कादायक! अकोल्यात 29 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

अकोला: अकोला (Akola) शहरात जुन्या वादातून 29 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली