बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण


कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे उघड्या ड्रेनेजमध्ये पडून आयुष कदम या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू नवरात्रीदरम्यान झाला होता. या गंभीर घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तातडीने दखल घेत संबंधित कडोंमपा अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. २८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री डोंबिवली सरेवरनगर परिसरात खुल्या ड्रेनेजजवळून जाताना आयुषने आपले प्राण गमावले.


परिसरात सुरू असलेल्या नाले, ड्रेनेज कामात सुरक्षा उपाययोजना न पाळणे, अंधार व चेतावणी फलकांचा अभाव, तसेच पालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते आणि उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲड. डॉ. राजू राम व ॲड. शिल्पा राम यांनी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली होती.तक्रारीमध्ये जबाबदार अधिकारी व ठेकेदारांची उच्चस्तरीय चौकशी करून, फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला तत्काळ ५० लाख ते १ करोड रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती.


आयोगाने तात्काळ कारवाई करत तक्रारीची छाननी केल्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्राथमिक जबाबदारी निश्चित केली. पोलीस उपायुक्तांना तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. मृत बालकाच्या पालकांना मानवी आधारावर आर्थिक नुकसान भरपाईची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले. दोषींवर आवश्यक ते फौजदारी प्रशासकीय कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ॲड. डॉ. राजू राम म्हणाले, “उघड्या ड्रेनेजमुळे एका निष्पाप बालकाचा मृत्यू हा प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचा परिणाम आहे. बालकाच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आणि जबाबदारांवर कठोर कारवाई न झाल्यास अशा दुर्घटना
थांबणार नाहीत.


नागरिकांचे, बालकांचे मूलभूत हक्क सुरक्षित ठेवणे ही पालिकेची आणि राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ते हक्क त्यांना मिळालेच पाहिजे, नागरिकांच्या व बालकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू''.

Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,