बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण


कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे उघड्या ड्रेनेजमध्ये पडून आयुष कदम या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू नवरात्रीदरम्यान झाला होता. या गंभीर घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तातडीने दखल घेत संबंधित कडोंमपा अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. २८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री डोंबिवली सरेवरनगर परिसरात खुल्या ड्रेनेजजवळून जाताना आयुषने आपले प्राण गमावले.


परिसरात सुरू असलेल्या नाले, ड्रेनेज कामात सुरक्षा उपाययोजना न पाळणे, अंधार व चेतावणी फलकांचा अभाव, तसेच पालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते आणि उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲड. डॉ. राजू राम व ॲड. शिल्पा राम यांनी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली होती.तक्रारीमध्ये जबाबदार अधिकारी व ठेकेदारांची उच्चस्तरीय चौकशी करून, फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला तत्काळ ५० लाख ते १ करोड रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती.


आयोगाने तात्काळ कारवाई करत तक्रारीची छाननी केल्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्राथमिक जबाबदारी निश्चित केली. पोलीस उपायुक्तांना तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. मृत बालकाच्या पालकांना मानवी आधारावर आर्थिक नुकसान भरपाईची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले. दोषींवर आवश्यक ते फौजदारी प्रशासकीय कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ॲड. डॉ. राजू राम म्हणाले, “उघड्या ड्रेनेजमुळे एका निष्पाप बालकाचा मृत्यू हा प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचा परिणाम आहे. बालकाच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आणि जबाबदारांवर कठोर कारवाई न झाल्यास अशा दुर्घटना
थांबणार नाहीत.


नागरिकांचे, बालकांचे मूलभूत हक्क सुरक्षित ठेवणे ही पालिकेची आणि राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ते हक्क त्यांना मिळालेच पाहिजे, नागरिकांच्या व बालकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू''.

Comments
Add Comment

Arjun Tendulkar आयपीएल मधून OUT ! बीसीसीआयकडून मिळाली परवानगी, दुसऱ्या लीग मध्ये खेळणार,नेमकं चाललंय काय ?

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याच्या खेळामुळे अनेकदा

Amruta Fadnavis New Song : अमृता फडणवीसांचे ‘नमन तुला’गाणे प्रदर्शित,गाण्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्याचा खास कॅमिओ

१ मे महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीसांचे 'नमन तुला'हे गाणे रिलीज झाले आहे.या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना

Bigg Boss Marathi Season 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन ६’चा ग्रँड फिनाले ठरला २०२६ मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

मुंबई : एंडेमोल शाइन इंडिया आणि Banijay Entertainment यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ हा यंदाच्या

Heeramandi : भारतापासून जगापर्यंत: ‘हीरामंडी’च्या जागतिक यशाच्या २ वर्षांचा जल्लोष

- ‘हीरामंडी’ला २ वर्षे: संजय लीला भन्साळी यांनी भारतीय कथाकथनाला कशी दिली जागतिक ओळख मुंबई : मे २०२४ मध्ये

Suresh Kumar Jaithalia : माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार

Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णी चक्क ५ तास अडकली ट्रॅफिकमध्ये; शेअर केला व्हिडीओ

मुंबई : मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडीही ही नवी नाही, परंतु एक रस्त्यांच्या कामांमुळे झालेली वाहतूक कोंडी ही अधिक