वायू प्रदूषण हे मुंबईतील सर्वांत गंभीर नागरी आव्हानांपैकी एक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'वायू प्रदूषण हे मुंबईसमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर नागरी आव्हानांपैकी एक आहे. एनसीएपी अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने धूळ नियंत्रण यंत्रणेच्या सहाय्याने रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन सुधारणा इत्यादींसारख्या प्रयत्नांना अधिक बळकटी दिली आहे. ‘ग्रीन लिव्हिंग, बेटर टुमॉरो’ हा उपक्रम लहान आणि दैनंदिन कृतींवर भर देतो, ज्यामुळे पर्यावरणावर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो,असे मत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातील कार्यकारी अभियंता वर्षा आठल्ये यांनी व्यक्त केले



महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे यांच्या देखीरेखीत पर्यावरणाच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच अनुषंगाने, केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी) अंतर्गत केंद्र शासन, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालय यांच्या सहकार्याने, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयआयएलएसजी) यांचे रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्वायरमेंटल स्टडीज (आरसीयूईएस) यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका उपायुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल) अविनाश काटे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयआयएलएसजी) यांचे रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्वायरमेंटल स्टडीजचे(आरसीयूईएस) संचालक डॉ. अजित साळवी, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक विजय रायसिंघानी, अधिष्ठाता प्रदीपकुमार मित्रा आदी या यावेळी उपस्थित होते. तर, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले. चेंबूर येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे शुक्रवारी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मत मांडले. तरुण हे बदलाचे खरे वाहक आहेत. आजच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी पर्यावरण संवर्धनात प्रभावीपणे योगदान देऊ शकतात, हे दिसून येते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.


पर्यावरण आपली जबाबदारी, ओला कचरा - सुका कचरा वर्गीकरण, वायू प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणीय सामाजिक शिक्षण आदी विषयांवरील प्रकल्पांना मान्यवरांनी भेट देऊन युवकांच्या संकल्पना जाणून घेतल्या. स्पर्धेतील प्रकल्प, पोस्टर, लघूपट आदींचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. तर, मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


.......................


रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्व्हायरमेंटल स्टडीजचे संचालक डॉ. अजित साळवी म्हणाले, महानगरपालिकेने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमासाठी घेतलेला पुढाकार अतिशय महत्त्वाचा आहे. अशा उपक्रमांमध्ये तरुणांना सहभागी करुन घेणे अत्यंत मोलाची बाब आहे. आज हे युवक पुढच्या पिढीसाठी चांगले पर्यावरण आणि उत्तम पृथ्वीसाठी योगदान देतील. त्यामुळे, नक्कीच पुढील पिढ्यांना फायदा होईल.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :