थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे १४५ मृत्यू

१२ प्रांतातील ३६ लाख नागरिकांना फटका


नवी दिल्ली  :थायलंडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. द मृतांचा आकडा १४५ वर पोहोचला आहे. पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, पुराचे पाणी कमी होत असताना, विनाशाचे भयानक दृश्ये समोर येत आहेत. थायलंडच्याक्षिण थायलंडमध्ये आपत्ती निवारण व व्यवस्थापन विभागाने सांगितले की, मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील  १२ प्रांतांमध्ये पूर आला आहे, ज्यामुळे १२ लाखांहून अधिक कुटुंबे व ३६ लाख लोक प्रभावित झाले आहेत.


बँकॉकमध्ये पत्रकार परिषदेत सरकारी प्रवक्ते सिरिपोंग अंगकासाकुल्कियात म्हणाले की, पुरामुळे आठ प्रांतांमध्ये १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. सोंगखला प्रांताला सर्वाधिक फटका बसला आहे, ज्यामध्ये ११० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पुराचे पाणी कमी होत असताना सोंगखला प्रांतातील मृतांची संख्या झपाट्याने वाढली आहे.


दक्षिण थायलंडमधील सर्वात मोठे शहर असलेल्या हात याईमध्ये सर्वाधिक मृतदेह सापडले. आपत्ती विभागाने शुक्रवारी सकाळी वृत्त दिले की, बहुतेक बाधित भागात पाणी कमी झाले आहे.

Comments
Add Comment

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.