लाल किल्ला पर्यटकांसाठी १० दिवस बंद

नवी दिल्ली : दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. ५ ते १४ डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी लाल किल्ला पूर्णपणे बंद असणार आहे.


भारत पहिल्यांदाच ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणा’संदर्भातील युनेस्कोच्या २०व्या सत्राचे आयोजन करत आहे. यासाठी लाल किल्ला हे ठिकाण निवडण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सहसंचालक नंदिनी भट्टाचार्य साहू यांनी सांगितले की, ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासंदर्भातील सत्र ८ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.


या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात २४ हून अधिक देशांचे प्रतिनिधी व एक हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होतील, ज्यामध्ये सांस्कृतिक वारसा, संवर्धन व जागतिक वारसा व्यवस्थापनाशी संबंधित तज्ज्ञ आणि अधिकारी यांचा समावेश असणार आहे.

Comments
Add Comment

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी

PM Modi - Meloni : ‘मोदींचा ऐतिहासिक महाविक्रम!’ थेट इटलीवरून आल्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. सलग सर्वाधिक

POK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचा भडका; भीषण हिंसाचार, आंदोलने आणि नेमकी परिस्थिती काय?

Mumbai : पाकव्याप्त काश्मीर (PoK) सध्या एका भीषण अशांततेच्या काळातून जात आहे. रावळकोटसह अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये

मोदी युगाचा नवा अध्याय; नरेंद्र मोदी ठरले भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 10 जून रोजी सलग

Uri Blast : ‘उरीमधील भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद; गस्तीदरम्यान नियंत्रण रेषेजवळ घडली दुर्दैवी घटना

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन

PM Narendra Modi 'X' Post : 'जनसेवा हाच खरा धर्म'!; ऐतिहासिक विक्रमानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट चर्चेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.