माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन

कानपूर : काँग्रेसचे कानपूरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे शुक्रवार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कानपूरच्या कार्डिओलॉजी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


श्रीप्रकाश जयस्वाल यांना रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे कानपूरच्या कार्डिओलॉजी रुग्णालयाचे हृदयरोग संचालक डॉ. राकेश वर्मा यांनी सांगितले. कानपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर श्रीप्रकाश जयस्वाल तीन वेळा खासदार झाले होते. ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते होते. त्यांनी यूपीए सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आणि नंतर कोळसा मंत्री म्हणून काम केले. त्यांच्या शांत वर्तनामुळे,उत्तम जनसंपर्कामुळे आणि स्वच्छ प्रतिमेमुळे सर्वपक्षीय त्यांचा आदर करत होते. कानपूरमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या निधनाने कानपूर काँग्रेसचे कधीही भरुन येणार नाही असे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

संजीवनी सैनिकी स्कूल राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम

कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला