माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन

कानपूर : काँग्रेसचे कानपूरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे शुक्रवार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कानपूरच्या कार्डिओलॉजी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


श्रीप्रकाश जयस्वाल यांना रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे कानपूरच्या कार्डिओलॉजी रुग्णालयाचे हृदयरोग संचालक डॉ. राकेश वर्मा यांनी सांगितले. कानपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर श्रीप्रकाश जयस्वाल तीन वेळा खासदार झाले होते. ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते होते. त्यांनी यूपीए सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आणि नंतर कोळसा मंत्री म्हणून काम केले. त्यांच्या शांत वर्तनामुळे,उत्तम जनसंपर्कामुळे आणि स्वच्छ प्रतिमेमुळे सर्वपक्षीय त्यांचा आदर करत होते. कानपूरमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या निधनाने कानपूर काँग्रेसचे कधीही भरुन येणार नाही असे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून

Valentine's Day: व्हॅलेंटाइन्स डेला द बॉडी शॉपकडून वैयक्तिक आणि आकर्षक गिफ्टिंग पर्याय

मुंबई: यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला पारंपरिक भेटवस्तूंना बाजूला ठेवत वैयक्तिक, विचारपूर्वक आणि आकर्षक पद्धतीने

The Lalla Anthem: अनिल कपूर आणि हरभजन सिंह यांचा दमदार संदेश – इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर परिणाम भोगावे लागतील!

अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ या गाण्यात भारताचे माजी क्रिकेटपटू

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी