महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत आहे. यासाठीच राज्यात स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेज प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याकरिता बारामतीसह काटोल, चांदुरबाजार, कळमनुरी आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील ७५ गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या गावांमध्ये सीसीटीव्ही, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षणासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील एकूण ७५ गावांमध्ये या प्रकल्पाचा प्रायोगिक तत्त्वावर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. बारामती आणि काटोल तालुक्यातील प्रत्येकी दहा गावांमध्ये तसेच कळमनुरी तालुक्यातील अकरा गावांमध्ये, चांदुरबाजार तालुक्यातील २३ तर वैभववाडी तालुक्यातील २१ गावांमध्ये प्रकल्प राबवला जाणार आहे.


नागपूरमधील मौजे सातनवरी या गावी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला होता. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील १० गावे या प्रकल्पांतर्गत समाविष्ट करून स्मार्ट व इंटेलिजंट व्हिलेज उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार, राज्यात सर्व जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये हा प्रकल्पात अंमलात येणार आहे.


प्रकल्पातून संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सीसीटीव्ही देखरेख, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण इत्यादी विभागांच्या ऑनलाइन सेवा व ई-प्रकल्प, स्मार्ट कृषि सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अशा स्मार्ट सेवा टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तर, प्रकल्पातील अडचणींच्या सोडवणुकीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाणार असून सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

BMC HQ : महापालिका मुख्यालय इमारतीला वाळवी, कंत्राट कामांची स्थायी समितीने मागवली माहिती

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी मुंबई : मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयातील दरवाज्यांना वाळवी लागल्याने

BMC : महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा नीट कार्यक्रम; आधी सभागृहात गोंधळ, मग सभागृहाबाहेर घोषणाबाजी

महापौरांच्या दालनापूर्वीच भाजपच्या नगरसेवकांनी विरोधकांचा अडवला रस्ता दोन्ही बाजुंनी तब्बल दोन तासांहून

BMC News : मुंबई रेबीज निर्मूलनासाठी महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : मुंबईतील (Mumbai) भटके श्वान (Dogs) व मांजरींचे (Cats) लसीकरणासाठी तसेच ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्यासाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ