खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् ; बार्शीत ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगावमध्ये गुरुवारी दुपारी ४ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गावात विहिरीत अडकलेली मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली.


याचदरम्यान जवळच खेळत असलेला शिवराज संदिप शेरखाने हा चार वर्षांचा मुलगा खेळता खेळता ट्रॅक्टरवर चढला. चुकून त्याच्या हातून गिअर सरकल्याने ट्रॅक्टरचा तोल गेला आणि क्षणार्धात तो थेट विहिरीत कोसळला. ही घटना इतकी अचानक घडली की आसपासच्या लोकांना प्रत्यक्षात काही समजायलाच वेळ मिळाला नाही. ट्रॅक्टर विहिरीत पडताच शिवराज बेचक्यात अडकल्याने त्याला वाचवणे अशक्य बनले.


अपघातानंतर शिवराजचे वडील संदिप शेरखाने यांनी मुलाला वाचवण्यासाठी तत्काळ धाव घेतली. गावातील युवकांनीही जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारत शोध मोहिम हाती घेतली. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.


अग्निशमन आणि पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र ट्रॅक्टर विहिरीच्या तळाशी अडकलेला, खोल पाणी आणि चिखल यामुळे शोधकार्य अत्यंत गुंतागुंतीचे झाले. ट्रॅक्टर बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रथम विहिरीतील पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला. सलग १२ तासांच्या प्रयत्नांनंतर विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात यश आले आणि पाणी उतरल्यावर शिवराजचा मृतदेह तळाशी दिसून आला. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. अवघ्या चार वर्षांच्या निरागस मुलाचा झालेला मृत्यू कुटुंबासाठी आणि गावासाठी मोठा धक्का आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत