ट्रायची स्पॅम कॉलवर कारवाई करण्यास सुरुवात

मुंबई : अनेक दिवसांपासून मोबाईल युजर्स हे स्पॅम कॉलबाबत तक्रारी करत होते. अनेकांना अनोळखी नंबरवरून कॉल यायचे आणि त्यांना कारण नसताना एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसच्या खरेदीबाबत गळ घातली जात होती. इतकेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून स्पॅम कॉलमार्फत डिजिटल फ्रॉड आणि लुटीचे प्रमाण देखील वाढले होते. दरम्यान आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने या स्पॅम कॉलवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मात्र ट्रायने या समस्येच्या मुळात जाऊन त्यांच्यावर कशी कारवाई करता येईल याचा विचार करायला हवा.

ट्रायने गेल्या वर्षात स्पॅम कॉल्सविरूद्ध कारवाई करत जवळपास २१ लाख मोबाईल नंबर बंद केले आहेत. त्या नंबर्सना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. या प्रकारच्या कारवाईची गरज अनेक दिवसांपासून होती. मात्र फोनवरून फ्रॉड करणारे आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अनेकांनी नवनवीन शक्कल लढवली आहे. एखाद्या व्यक्तीनं कंटाळून एक नंबर ब्लॉक केला तर त्याला दुसऱ्या नंबरवरून कॉल करून त्रास दिला जातो. त्यामुळे आता याला आळा घालण्यासाठी एका तांत्रिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यात सामान्य ग्राहकांना कोणत्याही वस्तू किंवा सेवा यांचा प्रचार किंवा इतर उद्येशाने केले जाणाऱ्या कॉल्सवर नियंत्रण ठेवता येईल. तसेच नको असलेल्या कॉलद्वारे होणाऱ्या डिजीटल फ्रॉड, सायबर क्राईम या गुन्ह्यांपासून देखील ग्राहकाचे संरक्षण होईल.
Comments
Add Comment

Kurla Landslide: कुर्ला पश्चिम बुद्ध कॉलनीसमोर दरड कोसळली, तीन कुटुंबांना पर्यायी जागेत हलवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कुर्ला पश्चिम येथील बुद्ध कॉलनीसमोरील दरडीच (Kurla Landslide) काही भाग कोसळण्याची घटना मंगळवारी

Powai Lake : पवई तलाव भरला, पण मुंबईकरांना नाही काही फायदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील (Mumbai) कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव

BMC : पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी ६८१ शोष खड्डे

तब्बल ५७६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर उभारणी पाणी मुरवण्याची सोय आतापर्यंत ७०० पैंकी ५७६ किलोमीटर

Chembur Bus Accident : चेंबूरमधील झाड दुघर्टनेेचे स्थायी समितीत तीव्र पडसाद

उद्यान अधिकारी, रस्ते अभियंता आणि सहायक आयुक्तांना निलंबित करा त्रयस्थ व्यक्ती मार्फत चौकशी करण्याचे स्थायी

जीएसटी' मध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

९ वा वस्तू व सेवा कर दिवस समारंभ मुंबई: देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर संकलन करण्यामध्ये महाराष्ट्र हे

Powai Lake Overflowing : आनंदवार्ता! मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला; पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे