अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिके नष्ट झाली, अनेक शेतजमिनी वाहून गेल्या, पशुधनाचे नुकसान झाले आणि काही भागांत जीवितहानीही झाली. घरांची पडझड, शेतीपूरक साधनांचे नुकसान अशा एकूण परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी पूर्णपणे कोलमडले होते.


या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला एक वर्षांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून संबंधित बँकांना वसुली थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


या निर्णयाचा लाभ अतिवृष्टी घोषित झालेल्या तालुका आणि गावांतील शेतकऱ्यांना मिळणार असून, संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे.हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला महत्त्वाचा पाऊल मानलं जात आहे. सरकारकडून हा एक प्रकारचा ‘स्ट्रॅटेजिक’ निर्णय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.अतिवृष्टीनंतर शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधवांकडून संपूर्ण कर्जमाफीची मागणी जोर धरत होती. विधानसभा निवडणुकीत महायुतीने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या पूर्ण कर्जमाफी न जाहीर करता, कर्जवसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

Comments
Add Comment

Viral Video :चालत्या बाईकवर 'हायव्होल्टेज' ड्रामा!...लोक पाहत राहिलीत..!

मुंबई: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे जो पाहून

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी