मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. जेजुरीसह विविध ठिकाणी अभिषेक, भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत भक्तांनी देवदर्शनाचा आनंद लुटला. दरवर्षीप्रमाणे यंदाही जेजुरीत उत्साहाची लाट उसळली. मात्र, काहींना प्रत्यक्ष जेजुरीला जाणं शक्य नसतं. अशा भाविकांसाठी मुंबईतच एक खास पर्याय उपलब्ध आहे.


मुंबईतही खंडेरायाचं शांत, पवित्र मंदिर


देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सतत धावत्या मुंबईतसुद्धा खंडोबाचं एक जुने मंदिर आहे. इथे सगळे विधी, कुळाचार आणि सोहळे पारंपरिक रीतीनुसार पार पाडले जातात. तळी भरण्यापासून बेलभंडारा उधळण्यापर्यंत सर्व विधी येथे घडतात. अनेक जणांच्या मते हे मंदिर म्हणजे मुंबईचीच जेजुरी. वर्षभर राज्याच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.


मलाबार हिलवर वसलेलं शांत देवस्थान


दक्षिण मुंबईतील मलाबार हिल–वाळकेश्वर रोडलगत बाणगंगा परिसरात हे मंदिर शांत वातावरणात वसलं आहे. स्थानिक मराठी कुटुंबांनी अनेक दशकांपूर्वी हे देवस्थान उभारल्याचं सांगितलं जातं. आकारानं लहान पण महत्त्वानं मोठं असलेलं हे मंदिर समुदायाभिमुख असून येथे दररोजची आरती, चंपाषष्ठीचे खास सोहळे आणि अन्य धार्मिक कार्यक्रम भाविकांना वेगळा अध्यात्मिक अनुभव देतात.


मंदिराचा पत्ता
तिन बत्ती, वाळकेश्वर रोड, मलाबार हिल, मुंबई – 400006


इथं कसं पोहोचायचं?


रेल्वेनं येणारांसाठी चर्नी रोड हे सर्वात जवळचं स्थानक आहे. मरिन लाइन्स आणि चर्चगेटही सोयीस्कर पर्याय आहेत. बेस्ट बस, टॅक्सी अथवा कॅबनेही मंदिरापर्यंत सहज जाता येतं. गर्दी तुलनेनं कमी असल्याने शांतपणे दर्शन घेण्याची संधी मिळते. जेजुरीला जाता येत नसेल तर मुंबईतील हे प्रतिजेजुरी नक्कीच अनुभवण्यासारखं ठरते. याशिवाय मुंबईतील अनेक कोळीवाड्यांतही खंडोबाची मंदिरे असून तिथेही चंपाषष्ठीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)