मुंबईतील दहिसरमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे धोका टळला !

मुंबई : राजधानी मुंबईतील दहिसर पूर्वेकडील आनंदनगर परिसरात आज मोठी आग लागली. दहिसर येथील एका उंच इमारतीत ही आग लागली, मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


आग लागलेली इमारत आनंदनगर परिसरातील सब्जी मार्केटच्या अगदी समोर स्थित आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने तात्काळ चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.


आगीमुळे इमारतीतील एक घर जळून खाक झाले, परंतु सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही झाले. यावर अधिक तपास सुरू असून, दहिसर पोलीस आणि अग्निशमन दल याचा शोध घेत आहेत.


आग लागल्यानंतर, इमारतीच्या परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामुळे रस्त्यावर गाड्यांची लांबच लांब रांग लागली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती