भारताचा दारुण पराभव; गौतम गंभीरवर टीकेची झोड, राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाला गंभीर?

गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला २-० ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर आणि विशेषत: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली आहे. गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत भारताला तब्बल ४०८ धावांनी हार पत्करावी लागली. गुवाहाटीत ५४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ १४० धावांत गारद झाला आणि हा भारताचा घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने झालेल्या पराभवांपैकी सर्वात मोठा पराभव ठरला. या दारुण कामगिरीनंतर सोशल मीडियाद्वारे गंभीरवर तीव्र टीका सुरू झाली असून त्याने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही ठिकाणी तर गंभीर लवकरच पद सोडणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत आहेत.


सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीरने पराभवाची जबाबदारी स्वीकारली. “दोष सर्वांचा आहे, पण सुरुवात माझ्यापासून करा,” असे तो म्हणाला. तसेच आपल्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल, असं सांगत गंभीरने इंग्लंड दौर्‍यातील चांगल्या कामगिरीची आणि आपल्या मार्गदर्शनाखाली जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी व आशिया कपची आठवणही करून दिली. त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाला अनेक अनपेक्षित धक्के बसले. ३६ वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून कसोटी पराभव, १९ वर्षांनी बंगलुरूच्या चिन्नास्वामीवर हार, पहिल्यांदाच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली, १२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव, वानखेडेवरील पराभव, तसेच पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ३-० ने क्लीन स्वीप, अशा अनेक निराशाजनक निकालांची नोंद गंभीरच्या कार्यकाळात झाली. याशिवाय, टीम इंडिया पहिल्यांदाच WTC फायनलसाठी पात्र ठरू शकली नाही, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही २५ वर्षांनी घरच्या मैदानावर मालिका गमवावी लागली.


या सलग पराभवांमुळे आणि संघाच्या सतत ढासळलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. गौतम गंभीरचे प्रशिक्षकपदही आता संकटात आल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआय लवकरच या प्रकरणी निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. चाहत्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी, संघाची घसरलेली कामगिरी आणि गंभीरवर वाढत चाललेला दबाव पाहता आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

घरच्या मैदानावर भारताचा पराभव; दक्षिण आफ्रिकेचा २-० ने कसोटी मालिकेत दणदणीत विजय

गुवाहाटी : गुवाहाटीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आणि दक्षिण आफ्रिकेनं ४०८

टी-२० विश्वचषक २०२६चे वेळापत्रक जाहीर, १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना

दुबई : आयसीसीने २०२६ च्या पुरुष टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, भारताचा पहिला सामना ७

रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

दुबई : भारताच्या माजी कर्णधार आणि दोन वेळा टी-२० विश्वचषक विजेता रोहित शर्मा याची आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी

द. आफ्रिकेची स्थिती मजबूत, गुवाहाटी कसोटी अनिर्णित राहणार की भारत हरणार ?

गुवाहाटी : गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ जसजसा पुढे सरकतोय, तसतसा भारताचा पराभव जवळ

T20 World Cup 2026 Full Schedule : ४ गट, २० संघ! २०२६ च्या ICC T-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; संपूर्ण ग्रुप रचना आणि सामन्यांची ठिकाणे; तुमचा आवडता संघ कुठे खेळणार?

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयसीसी विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) स्पर्धेचे

विजेत्या संघात महाराष्ट्राच्या गंगा कदमचा सिंहाचा वाटा

अंध महिला क्रिकेट विश्वचषकात भारताचा ऐतिहासिक विजय मुंबई : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबो, श्रीलंका