शिवकुमारांचा संयम की सिद्धरामय्यांचा निर्धार! कर्नाटकच्या राजकारणात खळबळ सुरू असल्याचे चिन्हं

कर्नाटक: कर्नाटक काँग्रेसमधील सत्तावाटपाचा वाद पुन्हा एकदा तापला आहे. सत्तेत परतल्यानंतर २०२३ मध्ये, काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांमध्ये एक सूत्र तयार झाले होते की सिद्धरामय्या हे कार्यकाळाच्या पहिल्या अडीच वर्षांसाठी आणि नंतरच्या अडीज वर्षांसाठी शिवकुमार मुख्यमंत्री पदावर असतील. मात्र आता कर्नाटक काँग्रेसमध्ये अडीच वर्षांच्या सत्तावाटप करारावरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे. कारण सिद्धरामय्या आता पूर्ण कार्यकाळाची मागणी करत आहेत. त्यामुळे या करारावर काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेईल यावर कर्नाटकच्या राजकारणाची पुढील सूत्रे हलणार असल्याचे दिसून येत आहे.



कर्नाटककरिता २०२३ मध्ये मंत्रिपदाची चर्चा सुरू असताना शिवकुमार यांनी सुरुवातीचा कार्यकाळ मागितला होता. सिद्धरामय्या यांनी ज्येष्ठ नेते असल्याचा हवाला देत शिवकुमार यांची मागणी फेटाळून टाकली होती. मात्र त्यांनी शिवकुमार यांना वचन दिले होते की, अडीच वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी एक आठवडा आधी मी राजीनामा देईन. परंतू, सध्याची परिस्थिती पाहता सिद्धरामय्या यांनी आपली भूमिका बदलली असल्याचे दिसते. सिद्धरामय्या हे कर्नाटकातील एकमेव नेते आहेत ज्यांना पक्षाच्या सर्वात शक्तिशाली पदांचा पूर्ण फायदा झाला आहे. जवळजवळ आठ वर्षे मुख्यमंत्री म्हणून, पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून आणि दीड वर्षे समन्वय समिती प्रमुख म्हणून त्यांनी पक्षाचा कारभार केला आहे. त्यामुळे अनुभव असल्याने त्यांनीच कार्यकाळ पूर्ण करावा असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना वाटते.



दरम्यान, शिवकुमार संयमाने वाट पाहत आहेत. महत्त्वाचे म्हणजे हायकमांडने घेतलेल्या निर्णयावर ते समाधानी नसले तर ते बंडखोरी करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर शिवकुमार यांनी बंडखोरी केली तर कर्नाटकातील काँग्रेसला मोठी किंमत मोजावी लागेल यात शंका नाही. यामुळे कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षांचा करार प्रत्यक्षात येईल की भारतीय राजकारणात मोठी खळबळ निर्माण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



याआधी २०१३ ला सिद्धरामय्या हे माध्यमांशी बोलताना काँग्रेस सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे सांगत होते. २ जुलै २०२५ रोजी जेव्हा त्यांनी पूर्ण कार्यकाळासाठी मुख्यमंत्री राहण्याची घोषणा केली तेव्हा त्यांची ठाम भूमिका असल्याचे दिसले. यानंतर २१ नोव्हेंबरपर्यंत ते या भूमिकेचे समर्थन करत होते. मात्र २२ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर त्यांची भूमिका कमकुवत झाल्याचे दिसले. सत्तावाटपाच्या मुद्द्यावर हायकमांड निर्णय घेईल, असे त्यांच्या बोलण्यात येऊ लागले.



सिद्धरामय्या यांनी यापूर्वीही असेच जाहीर दावे केले होते. २०१३ ला त्यांची शेवटची निवडणूक घोषित करून २०१८ ची निवडणूक लढवली. पण २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची मागणी केली. अडीज वर्षाच्या काळानंतर आता ते पूर्ण काळ मंत्री राहण्यासाठी आग्रही आहेत. यामुळे सिद्धरामय्या धोरणात्मक उलटसुलटपणा करतात असे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील सत्तेचा पेच सोडवण्यात यशस्वी होणार की विरोधकांना फायदा होणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Comments
Add Comment

Nashik : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकला वाहतूक नियोजनावर भर, भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज

Nashik : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

Sindhudurg News : देवगडच्या कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाहून मृत्यू

सिंधुदुर्ग : कोकणात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत सावध करणारी आणि मन हेलावून

ONGC Russia Venezuela oil wells : कच्च्या तेलाच्या बाजारात भारताची मोठी झेप! व्हेनेझुएला अन् रशियातील तेल विहिरींवर आता ONGC चे वर्चस्व

नवी दिल्ली : जागतिक इंधन बाजारात आणि ऊर्जा क्षेत्रात भारताचा प्रभाव अधिक मजबूत करणारी एक अत्यंत महत्त्वाची

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Jos Buttler T20 Record : क्रिकेट जगतात जोस बटलरचा डंका! पोलार्डला पछाडत बनला T20 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) टी२० (T20) क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या