मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण मुंबईला थेट वाढवण बंदराशी जोडण्यासाठी ३०० मीटर लांबीचा उन्नत पूल उभारण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा पूल तयार झाल्यानंतर एमएमआरडीएच्या उत्तन–विरार सागरी सेतूला वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट लिंक मिळेल आणि त्यामुळे मुंबईहून वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.


जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) देशातील सर्वात मोठ्या क्षमतेचे वाढवण बंदर उभारत आहे. या बंदराकडे सरळ प्रवेश देता यावा म्हणून NHAI वरोर–तवा जंक्शनदरम्यान विशेष महामार्गाचे बांधकाम करणार आहे. हा महामार्ग थेट वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. एमएमआरडीएच्या मते, हाच द्रुतगती मार्ग उत्तन–विरार सागरी सेतूसोबत जोडल्यास संपूर्ण सागरी कॉरिडॉरमध्ये अत्यंत महत्त्वाचे कनेक्शन तयार होईल.


कसा असेल ३०० मीटर उंचीचा उन्नत पूल ?


उत्तन–विरार सागरी सेतूचा शेवट विरारमधील चिखल डोंगरी भागात आहे.


या ठिकाणापासून काही अंतरावरच वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्ग (VME) जातो.


दोन्ही मार्ग एकमेकांशी प्रत्यक्ष जोडण्यासाठी ३०० मीटर उन्नत पुलाचे बांधकाम केले जाईल.


हा फ्लायओव्हर NHAI उभारणार असून राज्य आणि केंद्र शासनातील अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली.


एमएमआरडीएच्या अंदाजानुसार, सागरी किनारा मार्ग, विविध सागरी सेतू, जोड रस्ते, द्रुतगती मार्ग आणि विशेष महामार्ग अशा एकूण सुमारे १२० किमी लांबीचा अखंड, सरळ आणि उच्च-गतीचा मार्ग तयार होणार आहे.
या मार्गामुळे :


दक्षिण मुंबई ते वाढवण बंदर फक्त एका तासात पोहोचता येईल


विरार–वाढवणदरम्यान स्वतंत्र सागरी मार्ग बांधण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च वाचेल


बंदर वाहतूक, औद्योगिक प्रवास, लॉजिस्टिक नेटवर्क आणि मालवाहतुकीला मोठा लाभ मिळेल

Comments
Add Comment

शिवसेना आमदार कुडाळकर यांच्याविरोधात म्हाडाच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

मुंबई : भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या विशेष न्यायालयाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला

Ashish Shelar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विचारांवर नेहमीच खरी!' आशिष शेलारांची कवितेतून संजय राऊतांवर जहरी टीका

राऊतांच्या पुनरागमनावर मंत्री शेलारांची उपरोधिक टोलेबाजी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या

महापालिका म्हणतेय, गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईच्या हवेतील गुणवत्तेत सुधारणा

समीर ऍप आणि संकेतस्थळाच्या आकडेवारीच्या आधारे केला महापालिकेला दावा मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण

सोने तस्करीसाठी मुंबई विमानतळ मुख्य केंद्र! काय सांगतो डीआरआयचा अहवाल? जाणून घ्या सविस्तर

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंना अटक होणार ?

मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च