मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण मुंबईला थेट वाढवण बंदराशी जोडण्यासाठी ३०० मीटर लांबीचा उन्नत पूल उभारण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा पूल तयार झाल्यानंतर एमएमआरडीएच्या उत्तन–विरार सागरी सेतूला वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट लिंक मिळेल आणि त्यामुळे मुंबईहून वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.


जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) देशातील सर्वात मोठ्या क्षमतेचे वाढवण बंदर उभारत आहे. या बंदराकडे सरळ प्रवेश देता यावा म्हणून NHAI वरोर–तवा जंक्शनदरम्यान विशेष महामार्गाचे बांधकाम करणार आहे. हा महामार्ग थेट वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. एमएमआरडीएच्या मते, हाच द्रुतगती मार्ग उत्तन–विरार सागरी सेतूसोबत जोडल्यास संपूर्ण सागरी कॉरिडॉरमध्ये अत्यंत महत्त्वाचे कनेक्शन तयार होईल.


कसा असेल ३०० मीटर उंचीचा उन्नत पूल ?


उत्तन–विरार सागरी सेतूचा शेवट विरारमधील चिखल डोंगरी भागात आहे.


या ठिकाणापासून काही अंतरावरच वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्ग (VME) जातो.


दोन्ही मार्ग एकमेकांशी प्रत्यक्ष जोडण्यासाठी ३०० मीटर उन्नत पुलाचे बांधकाम केले जाईल.


हा फ्लायओव्हर NHAI उभारणार असून राज्य आणि केंद्र शासनातील अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली.


एमएमआरडीएच्या अंदाजानुसार, सागरी किनारा मार्ग, विविध सागरी सेतू, जोड रस्ते, द्रुतगती मार्ग आणि विशेष महामार्ग अशा एकूण सुमारे १२० किमी लांबीचा अखंड, सरळ आणि उच्च-गतीचा मार्ग तयार होणार आहे.
या मार्गामुळे :


दक्षिण मुंबई ते वाढवण बंदर फक्त एका तासात पोहोचता येईल


विरार–वाढवणदरम्यान स्वतंत्र सागरी मार्ग बांधण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च वाचेल


बंदर वाहतूक, औद्योगिक प्रवास, लॉजिस्टिक नेटवर्क आणि मालवाहतुकीला मोठा लाभ मिळेल

Comments
Add Comment

‘वसुधैव कुटुंबकम् संमेलन ४.०’ – संक्रमण काळाच्या पार्श्वभूमीवर १६ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान मुंबईत आयोजन

मुंबई :  ज्योत (इंडिया) संस्थेच्या वतीने आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ‘वसुधैव

CSMT स्टेशनवर विमानतळासारखी सुरक्षा; वाढत्या धमक्यांनंतर कडक निर्बंध,आता प्रवेश सहज नाही…

मुंबई : रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) मेल आणि एक्सप्रेस प्रवाशांसाठी बॅगेज तपासणी अनिवार्य

CSMT Station : "आता रेल्वे प्रवासापूर्वी होणार विमानतळासारखी झडती! CSMT स्थानकात प्रवेशाचे नियम बदलले; पाहा काय आहे अट

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील सुरक्षा

काका आणि पुतणी एकाच प्रभागातून निवडणूक रिंगणात

धनुष्यबाण आणि मशालीमध्ये रंगणार लढत मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : प्रभाग एक. . . घर एक…. कुटुंब एक…. पक्ष वेगळे… चिन्ह

उबाठा म्हणते मुंबईत ठिकठिकाणी स्टॉर्म वॉटर होल्डींग टँक्स बांधणार

पावसाच्या तुंबणाऱ्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी भूमिगत टाक्यांची उभारणी वचननाम्याचा पंचनामा मुंबई (विशेष

मुंबईत उबाठा आणि काँग्रेसची छुपी युती?

एकाच टेबलवर बसवून बनवला दोन्ही पक्षांचा वचननामा मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक