मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण मुंबईला थेट वाढवण बंदराशी जोडण्यासाठी ३०० मीटर लांबीचा उन्नत पूल उभारण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा पूल तयार झाल्यानंतर एमएमआरडीएच्या उत्तन–विरार सागरी सेतूला वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट लिंक मिळेल आणि त्यामुळे मुंबईहून वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.


जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) देशातील सर्वात मोठ्या क्षमतेचे वाढवण बंदर उभारत आहे. या बंदराकडे सरळ प्रवेश देता यावा म्हणून NHAI वरोर–तवा जंक्शनदरम्यान विशेष महामार्गाचे बांधकाम करणार आहे. हा महामार्ग थेट वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. एमएमआरडीएच्या मते, हाच द्रुतगती मार्ग उत्तन–विरार सागरी सेतूसोबत जोडल्यास संपूर्ण सागरी कॉरिडॉरमध्ये अत्यंत महत्त्वाचे कनेक्शन तयार होईल.


कसा असेल ३०० मीटर उंचीचा उन्नत पूल ?


उत्तन–विरार सागरी सेतूचा शेवट विरारमधील चिखल डोंगरी भागात आहे.


या ठिकाणापासून काही अंतरावरच वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्ग (VME) जातो.


दोन्ही मार्ग एकमेकांशी प्रत्यक्ष जोडण्यासाठी ३०० मीटर उन्नत पुलाचे बांधकाम केले जाईल.


हा फ्लायओव्हर NHAI उभारणार असून राज्य आणि केंद्र शासनातील अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली.


एमएमआरडीएच्या अंदाजानुसार, सागरी किनारा मार्ग, विविध सागरी सेतू, जोड रस्ते, द्रुतगती मार्ग आणि विशेष महामार्ग अशा एकूण सुमारे १२० किमी लांबीचा अखंड, सरळ आणि उच्च-गतीचा मार्ग तयार होणार आहे.
या मार्गामुळे :


दक्षिण मुंबई ते वाढवण बंदर फक्त एका तासात पोहोचता येईल


विरार–वाढवणदरम्यान स्वतंत्र सागरी मार्ग बांधण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च वाचेल


बंदर वाहतूक, औद्योगिक प्रवास, लॉजिस्टिक नेटवर्क आणि मालवाहतुकीला मोठा लाभ मिळेल

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करणार

आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था