कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा स्व. आनंद दिघे उड्डाणपूल बंद

कडोंमपाकडून पुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामास सुरुवात


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या स्व. आनंद दिघे उड्डाणपुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, या काळात उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही वाहतूक मर्यादा लागू राहील. या कालावधीत पुलावरील जुना डांबर थर काढून नव्या डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. कामाच्या दरम्यान परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.


कल्याण पूर्वेतून स्व.आनंद दिघे पुलावरून कल्याण पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ही वाहने चक्कीनाका व श्रीराम चौक मार्गे वळवली जातील. कल्याण पश्चिमेतून स्व. आनंद दिघे पुलावर येणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील. ही वाहने सम्राट चौक येथून सरळ पुढे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार–शांतीनगर–श्रीराम चौक मार्गे कल्याण पूर्वेकडे वळतील. उल्हासनगर व कल्याण पश्चिमहून कल्याण पूर्वेकडे येणाऱ्या वाहनांना सम्राट चौक येथे प्रवेशबंदी राहील. वाहतूक विभाग पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली असून २५ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर व ऑक्सिजन गॅस वाहने यांना बंदीमधून सूट देण्यात आली आहे. महापालिका आणि वाहतूक विभागाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या