लाडकी बहीण योजना कायम राहणार; नगरपालिकांवर भगवा फडकवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

अकोला : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील सभेत मतदारांना उद्देशून मोठी घोषणा केली. अयोध्या राममंदिरातील कळस व धर्मध्वज अनावरणाचा उल्लेख करत त्यांनी नगरपालिकांवरही भगवा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले. “अयोध्येच्या मंदिरावर भगवा फडकला, तसाच भगवा हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट नगरपालिकांवरही फडकला पाहिजे,” असे फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपने प्रत्येक शहराच्या विकासासाठी स्पष्ट आराखडा तयार केला आहे. राज्यातील अनेक गावांवर लक्ष दिले गेले, मात्र शहरांच्या मूलभूत सुविधांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने शहरी भाग बकाल झाले आहेत. पारदर्शक आणि जबाबदार कामकाजासाठी भाजपचे उमेदवार पुढे केले असल्याचे त्यांनी नमूद केले.



“जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही”


फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य करत महत्त्वाचा संदेश दिला. “निवडणुकांच्या काळात विरोधकांनी पसरवले की सरकार ही योजना थांबवेल. पण माझ्या बहिणींना मी स्पष्ट सांगतो, तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही,” असे त्यांनी आश्वासन दिले.


ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात सरकारने कोणतीही योजना बंद केली नाही; उलट लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पिकविमा, आणि कृषीविषयक अनेक निर्णय सातत्याने राबवले जात आहेत. “आम्ही फक्त आश्वासनाची राजकारण करणारे नसून लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्यावर आमचा भर आहे,” असे ते म्हणाले.


अयोध्येतील राममंदिराच्या कळस व धर्मध्वज अनावरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिराचे काम पूर्णत्वास येते तेव्हा कळस बांधला जातो. “आज अयोध्या पूर्ण झाली, आता तुमच्या परिसरात विकासाचा कळस चढवण्याची जबाबदारी तुमच्या हातात आहे,” असे ते म्हणाले.


सभेनंतर मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जाऊन ११ नगरपरिषदांच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराला संबोधित केले.

Comments
Add Comment

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग

पुण्यात वाढतेय बिबट्याची दहशत! औंधनंतर आता धानोरीमध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढली आहे. ग्रामीण भागात दिसणाऱ्या बिबट्यांची

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड