बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या भीतीच्या वातावरणावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी संशोधक डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेती, शिक्षण आणि आरोग्यव्यवस्था विस्कळीत झाली आहे. रात्री शेतात जाणे, विद्यार्थ्यांची हालचाल, आपत्कालीन रुग्णवाहतूक यावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर वाढले असून मानसिक ताणही वाढत आहे.डॉ. गुंजाळ यांनी बिबट्या समस्येवर संशोधन करून मानव-वन्यजीव सहजीवनाचा शास्त्रोक्त प्रकल्प तयार केला असून तो शासनाला मंजुरीसाठी सादर केला आहे. बिबट्यांना न मारता अथवा खच्चीकरण न करता तांत्रिक उपायांनी त्रास कमी करण्याचा हा प्रकल्प आहे
Comments
Add Comment

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कहर

पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, नाशिकमध्ये शेतकरी चिंतातूर मुंबई : अवकाळी पावसाबाबतचा हवामान विभागाचा अंदाज बऱ्याच

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा

'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

मुंबई :  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा

Maharashtra Weather Alert : भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे

मुंबई : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या वेळेतच

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट..

उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण.. मुंबई  :

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील