बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या भीतीच्या वातावरणावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी संशोधक डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेती, शिक्षण आणि आरोग्यव्यवस्था विस्कळीत झाली आहे. रात्री शेतात जाणे, विद्यार्थ्यांची हालचाल, आपत्कालीन रुग्णवाहतूक यावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर वाढले असून मानसिक ताणही वाढत आहे.डॉ. गुंजाळ यांनी बिबट्या समस्येवर संशोधन करून मानव-वन्यजीव सहजीवनाचा शास्त्रोक्त प्रकल्प तयार केला असून तो शासनाला मंजुरीसाठी सादर केला आहे. बिबट्यांना न मारता अथवा खच्चीकरण न करता तांत्रिक उपायांनी त्रास कमी करण्याचा हा प्रकल्प आहे
Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.