बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या भीतीच्या वातावरणावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी संशोधक डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेती, शिक्षण आणि आरोग्यव्यवस्था विस्कळीत झाली आहे. रात्री शेतात जाणे, विद्यार्थ्यांची हालचाल, आपत्कालीन रुग्णवाहतूक यावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर वाढले असून मानसिक ताणही वाढत आहे.डॉ. गुंजाळ यांनी बिबट्या समस्येवर संशोधन करून मानव-वन्यजीव सहजीवनाचा शास्त्रोक्त प्रकल्प तयार केला असून तो शासनाला मंजुरीसाठी सादर केला आहे. बिबट्यांना न मारता अथवा खच्चीकरण न करता तांत्रिक उपायांनी त्रास कमी करण्याचा हा प्रकल्प आहे
Comments
Add Comment

महापालिकेत पहिले पक्ष कार्यालय मिळवण्यात भाजपने मारली बाजी

शुक्रवारी विधीवत पुजा करून करणार प्रवेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्यानंतर

उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या आणि बढती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्त विनायक विसपुते यांना उपायुक्त पदी बढती देण्यात

कचऱ्याच्या जुन्या आणि खराब वाहनांना रस्त्यांवर नो एंट्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात असलेली कचऱ्याची वाहने आता

'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबईत २७ व २८ मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला

Dombilvli: डोंबिवलीत शॉरमावालीच्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो, अविनाश जाधवांनी दिलेला शब्द पाळला

डोंबिवली: मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिका

एका खटक्यात दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसर साफ

चोरबाजारासह अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांवर कारवाई मुंबई :  दादर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत मागील