Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीवर काम करताना आठव्या मजल्यावरून सहा कामगार खाली कोसळल्याची दुर्घटना शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.



सहाही कामगार गंभीर जखमी :


प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इमारतीचे बांधकाम सुरू असताना हे कामगार ८व्या मजल्यावर काम करत होते. अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. या अपघातात सहाही कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.



नियमांचे उल्लंघन केल्याने घडला अपघात :


माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कामगारांनी आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर केलेला नव्हता. उंच इमारतींवर काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि इतर सुरक्षात्मक उपकरणे वापरणे बंधनकारक असते. मात्र या ठिकाणी नियमांचे पालन झाले नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. योग्य सुरक्षा साधने वापरली असती तर हा अपघात टाळता आला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.



तत्काळ मदतकार्य सुरू :


अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या; म्हणाल्या, न घाबरता 'ती' भूमिका...महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वरून वाद पेटला!

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू