Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीवर काम करताना आठव्या मजल्यावरून सहा कामगार खाली कोसळल्याची दुर्घटना शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.



सहाही कामगार गंभीर जखमी :


प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इमारतीचे बांधकाम सुरू असताना हे कामगार ८व्या मजल्यावर काम करत होते. अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. या अपघातात सहाही कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.



नियमांचे उल्लंघन केल्याने घडला अपघात :


माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कामगारांनी आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर केलेला नव्हता. उंच इमारतींवर काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि इतर सुरक्षात्मक उपकरणे वापरणे बंधनकारक असते. मात्र या ठिकाणी नियमांचे पालन झाले नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. योग्य सुरक्षा साधने वापरली असती तर हा अपघात टाळता आला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.



तत्काळ मदतकार्य सुरू :


अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Schools Open : राज्यातील सर्व शाळा गुरुवारी सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई : ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या