आहे त्याच दरात, लोकलचा प्रवास होणार गारेगार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील युवकांना आश्वासन


मुंबई : आम्ही मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित करत आहोत. या लोकलचे सर्व दरवाजे आपोआप बंद होतील. त्यामुळे कोणीही लोंबकळत प्रवास करू शकणार नाही. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की, आम्ही मेट्रोइतकीच सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार आहोत. मात्र, ते करत असताना द्वितीय श्रेणी डब्याचे तिकीट एक रुपयानेही वाढवणार नाही. आताचा जो तिकीट दर आहे, त्याच दराने आम्ही मुंबईकरांना वातानुकूलित ट्रेनचे तिकीट देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


रेल्वेमध्ये गर्दीची समस्या असून प्रवासी रेल्वेच्या दरवाजात उभे राहून लोंबकळत प्रवास करतात. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट होणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.


वॉटर टॅक्सीचे जाळे तयार करणार


फडणवीस पुढे म्हणाले, ‘आम्ही मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा देखील सुरू करत आहोत. मुंबई-अलिबाग रो-रोच्या धर्तीवर मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होतील. वॉटर टॅक्सीचे मोठे जाळे तयार केले जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर प्रवासी वॉटर टॅक्सीने गेट वे ऑफ इंडियाला जाऊ शकतात.’


लोकलमधून दररोज ९० लाख लोकांचा प्रवास


मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज ९० लाख लोक या लोकलने प्रवास करतात; परंतु लोकलमध्ये इतकी गर्दी असते की खरा मुंबईकरच या रेल्वेने प्रवास करू शकतो. बाहेरचा माणूस या लोकल ट्रेनमध्ये प्रवेश सुद्धा करू शकत नाही. या लोकलचा विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की, सुंदर अशी मेट्रो मुंबईकरांना दिल्यानंतर आता लोकल रेल्वेचा कायापालट करणं आवश्यक आहे.’

Comments
Add Comment

मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांची पॅरापेट कोसळल्याच्या घटनेनंतर मेट्रो लाईन ४ साठी थर्ड पार्टी ऑडिटची मागणी

एमएमआरडीए आणि टी-वार्ड अधिकाऱ्यांसह एलबीएस रोड पट्ट्यावर आमदार मिहिर कोटेचा यांची संयुक्त पाहणी पॅरापेट

Nitesh Rane : काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची

‘शिवजयंती निमित्त, विलेपार्ले येथे शिवकल्याण राजा’

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीतांचा भव्य कार्यक्रम मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज

Praful Patel : होय, अजित पवारांना निधनाच्या आदल्या दिवशी फोन केला होता! प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले बोलणे

मुंबई : "निधनाच्या आदल्या दिवशी मी अजितदादांना दिल्लीतून फोन केला होता, पण तो शेतकऱ्यांच्या कामासाठी होता.

Raj Thackeray Eknath Shinde : राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, नव्या हालचालींना वेग...

मुंबई : राज्याच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे नेते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवरायांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणमध्ये अध्यासन केंद्र - मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; शासनाकडून विशेष निधी मंजूर

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल