मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी पर्वाला उजाळा देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतल्या एका सुवर्ण अध्यायाचा अंत झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले की, ब्लॅक अँड व्हाईटच्या काळापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत धर्मेंद्र यांनी सातत्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. स्वप्नाळू आणि आत्मीय तरुण नायकापासून ते बलदंड, तडफदार व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतंत्र छाप उमटवली. कालांतराने ‘ही-मॅन ऑफ बॉलिवूड’ म्हणून मिळालेली त्यांची ओळख त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेची साक्ष देते.


शोलेमधील वीरूची मैत्री जशी पडद्यावर अजरामर झाली, तशीच मैत्री आणि जिव्हाळा जपणारी त्यांची स्वाभाविक वृत्ती वास्तवातही जाणवायची, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जुन्या आणि नव्या दोन्ही पिढ्यांना जोडणारा सेतू म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिले जात असे. अनेकांचे ते मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान होते.


चित्रपटसृष्टीसोबतच त्यांनी बिकानेरचे लोकसभा प्रतिनिधित्व करत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणूनही कार्य केले. मात्र अभिनय आणि सर्जनशील प्रयोगशीलता यांनाच त्यांनी सदैव महत्व दिले. तीनशेहून अधिक चित्रपटांत त्यांच्या बहुरंगी भूमिका पाहायला मिळतात. एकाच वर्षी नऊ हिट चित्रपट देण्याचा त्यांच्याकडे असलेला विलक्षण विक्रम आजही सिनेसृष्टीत अभिमानाने आठवला जातो.


आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते सिनेसृष्टीत सक्रिय राहिले, हा त्यांचा व्यासंग आणि समर्पणाचा सर्वोच्च नमुना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांसह कोट्यवधी चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही मन:पूर्वक सहभागी आहोत आणि ईश्वर सर्वांना धैर्य देओ, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

राखीव खाटा न दिल्याने परळच्या ग्लोबल रुग्णालयावर कारवाई

राज्यमंत्री माधुरी मिसाळ; अतिरिक्त एफएसआय सवलत रद्द करणार मुंबई : परळ येथील ग्लोबल रुग्णालयाकडून गरीब

ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करणार मुंबई : नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात

महाविद्यालयांमध्ये तब्ब्ल ५०१२ प्राध्यापकांची भरती; उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा!

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण विभागातर्फे मोठी घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

Cyber ​​Fraud in Gas Booking : सावधान! गॅस बुकिंगच्या नावाखाली होतोय सायबर फ्रॉड; काही मिनिटांत खात्यातून लाखो रुपयांचा गंडा

मुंबई : गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या घटना

Mumbai: मुंबईत पाणीबाणी, एप्रिल-मेमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची भीती

मुंबई: ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. १५ मार्च २०२६