१२ वर्षांचा दुरावा संपला; दानवे–लोणीकर पुन्हा एकत्र, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना जालना जिल्ह्यातील एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांनी तब्बल १२ वर्षे असलेला अबोला संपवत पुन्हा हातमिळवणी केल्याचे चित्र दिसले. गेली चार दशके पक्षात एकत्र काम करणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळापासून मतभेद होते. मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही एकत्र येऊन प्रचाराला वेग दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.


एका कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, “आमचा वाद हा वैयक्तिक नव्हता. कोणत्या कार्यकर्त्याला संधी द्यायची, कोणाला पद मिळावे यावरून मतभेद झाले होते. विरोधकांनी त्याचा फायदा घेतला, पण आता ते सर्व संपले आहे.”


ते पुढे म्हणाले, “भाजपला आम्ही उभं केलं, त्याला बळ दिलं. आता पुन्हा एकत्र येण्यात काहीही आश्चर्य नाही. पुढील निर्णय आम्ही दोघे मिळून घेणार आहोत. हा वाद कार्यकर्त्यांसाठी सुरू झाला आणि आता त्यांच्याच हितासाठी संपवला आहे.”


दानवे यांनी विरोधकांवर टोल लगावत म्हटले, “आम्ही एकत्र आल्याने काहींचा तोल जाईल. जुळू इच्छिणारे जुळतीलच. ही विचारांची लढाई आहे.”


ते पुढे म्हणाले की, ज्या काळात भाजप जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर होता, त्या काळात दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केले. “आज पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे आणि ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही एकत्र आलो आहोत, आता कार्यकर्त्यांनीही एकत्र यावं,” असे आवाहन त्यांनी केले.


राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनीही एकजुटीचा संदेश दिला. ते म्हणाले, “जिल्ह्यात भाजप अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे घडवून आणली आहेत. आता पुढील विकास आणि पक्षाच्या बळकटीसाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत.”

Comments
Add Comment

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Beed News: दोन बहिणींनी अपहरणाचा कट लावला उधळून

बीड: महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी