वरळीतील आत्महत्या प्रकरण: पतीचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील वरळीमध्ये पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिने शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच परिसरात आणि राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला.


गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात बीडमध्ये झाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे आणि मानसिक तणाव निर्माण झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. गौरी पालवे केईएम रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होती. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ती रुग्णालयात होती आणि नंतर घरी आली. यानंतर संध्याकाळी तिने हे धक्कादायक पाऊल उचलले.


सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. परंतु गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याने गौरीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेर रविवारी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिसांनी अनंत गर्जे, त्याची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १०८, ८५, ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे याचा आरोप आहे.


कुटुंबीयांच्या मते, सासरच्या मंडळींकडून सतत छळ होत होता. तसेच गौरीने पतीच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग पकडल्याचेही समोर आले. यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे पालवे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.


गौरी पालवे गर्जेने आपला जीव दिला नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे.


सध्या अनंत गर्जे कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. पोलिस आता या प्रकरणात अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध पुढील कारवाई काय करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

मनपा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

जे साथ देतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकारणात कोणीही शत्रू नाही

मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या

मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर भाजपने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले

राणेंचे घर तोडण्यापासून सुरुवात झाली, आता मातोश्री-२ ची वेळ!

मंत्री नितेश राणेंचा इशारा; ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत मुंबईत आमचा महापौर विराजमान होणार मुंबई : “उद्धव ठाकरेंनी

महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू