BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईचा आढावा घेत त्या भागांना प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर तसेच महापालिका सभागृहात फेरीवाला माफियांविरोधात नगरसेवकांकडून कारवाईची मागणी केल्यानंतरही दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना हटवण्यात महापालिकेला अपयश येत आहे. महापालिका आणि पोलिस यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई केली जात असली तरी प्रत्यक्षात कारवाई करणारे पथक पुढे निघून गेल्यानंतर स्थानक परिसरातच मोठ्याप्रमाणात फेरीवाले व्यवसाय करत असल्याने आता या फेरीवाल्यांना महापालिका आणि पोलिसांची भीतीच वाटत नाही की चिरीमिरी दिल्यामुळे पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी केवळ कारवाईचे नाटक करून त्यांना व्यवसाय करण्यास देत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.


मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी फेरीवाल्यांसह अतिक्रमण हटवण्याची जी मोहिम हाती घेतली आहे, त्याचे परिणाम आता मुंबईत दिसून येत आहे. त्यामुळेच सुरुवातीला या कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना सेवा निवृत्तीच्या एक महिना आधी का होईना या कारवाईचे समर्थन करत काही भाग फेरीवाला मुक्त केले जातील अशी घोषणा करावी लागली आहे. याचा आधार घेत महापालिका सभेत उबाठाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी फेरीवाला माफियाचा मुद्दा उपस्थित करून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते.


विशेष म्हणजे या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील फेरीवाल्यांविरोधातील कारवाई अधिक कडक तथा तीव्र होण्याची शक्यता असतानाही दादर रेल्वे स्थानक पश्चिम परिसराच फेरीवाले व्यवसाय करताना दिसत आहे. एवढेच नाही तर आवाज देत आपल्या वस्तूही विकत आहे. जावळे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, केशवसूत उड्डाणपूल तसेच रानडे मार्गावर हे चित्र आता रात्री आठनंतर उशिरापर्यंत दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे रेल्वे स्थानकापासून शंभर मीटरच्या पुढील बाजुस कडक कारवाई दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिस प्रशासन हे न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करते की अवमुल्यन करते असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिथे स्थानकापासून १०० मीटरच्या पुढील बाजुस कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना तिथे कडक कारवाई करताना दुसरीकडे रेल्वे स्थानकाच्या दरवाजात मात्र कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या कारवाईवर शंका उपस्थित होत आहे.



उबाठा नगरसेवकाच्या मागणीला विरोधी पक्षनेत्यांचा नाही पाठिंबा : 


फेरीवाला माफियावर कारवाई करण्याच्या मागणी उबाठाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी केली. हरकतीच्या मुद्दयाद्वारे यावर उबाठाने आवाज उठवलेला असतानाच त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या हरकतीच्या मुद्दयाला पाठिंबा दिला नाही किंबहुना समर्थनही केले नाही. एवढेच नाही तर सभागृहात उपस्थित विशाखा राऊत, सचिन पडवळ, रमाकांत रहाटे यांच्यासह कुणीच त्यावर भाष्य केले नाही. उलट फणसे यांच्या मागणीला भाजपने पाठिंबा दिला. सभागृहनेते गणेश खणकर यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवानंद शेट्टी, राखी जाधव, सुषम सावंत या भाजपच्या सदस्यांनी समर्थन केले, तर उबाठाच्या श्रध्दा जाधव आणि प्रमोद सावंत व्यतिरिक्त कुणीही तोंड उघडले नाही. तर काँग्रेसच्या अश्रफ आझमी, नसीमा जुनेजा यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादीच्या अजित रावराणे याचे समर्थन केले. परंतु, आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकाने मांडलेल्या हरकतीच्या मुद्दयाला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पाठिंबा देत एकप्रकारे फणसे यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केला, पण भाजपने त्यांना सावरत राष्ट्रभक्त नागरिक म्हणून त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या या केवळ आपल्याच मर्जीतील नगरसेवकांची बाजू लावून धरत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला