परभणीत राजकीय राडा; पाथरीत दगडफेक आणि तलवारीने हल्ले

परभणी : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक स्तरावर प्रचाराला जोरदार रंग चढला असून अनेक नेते आणि उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी हालचाली सुरू असताना, काही भागांत मात्र संघर्षाची शक्यता वाढत आहे. अशातच परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात प्रचारादरम्यान झालेल्या हिंसक घटनेने खळबळ उडाली आहे.


दगडफेक, तलवारी आणि चाकूंसह हल्ले


पाथरी तालुक्यात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचारादरम्यान शिंदे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत वाद चिघळला. अल्पावधीतच परिस्थिती ताणली गेली आणि वाद थेट हिंसक स्वरुपात बदलला. घटनेदरम्यान तलवारी आणि चाकूंसह हल्ले झाल्याची माहिती मिळाली असून दोन्ही गटातील काही जण जखमी झाले आहेत. दगडफेक आणि धारदार शस्त्रांच्या हल्ल्यांमुळे काहींना डोक्यावर टाके घालावे लागले आहेत. जखमींना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप करत वातावरण आणखी तापवले आहे.


हर्षवर्धन सपकाळ यांना काळे झेंडे


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पाथरीत प्रचारासाठी आले असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या भाषणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सपकाळ यांना काळे झेंडे दाखवले. नंतर सेलू शहरातही सपकाळ यांच्या आगमनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत देवेंद्र फडणवीस झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

Comments
Add Comment

Mumbai local : प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवार ३१ मे रोजी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे रविवार ३१ मे २०२६ रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे

छगन भुजबळ आणि माझ्यात वाद नाहीत - सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील

‘मान्सून’चे आगमन लांबले?

मुंबई : ‘आज येईल, उद्या येईल’, म्हणून संपूर्ण देश ज्याची चातकासारखी वाट पाहत आहे, तो नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात

Rainy Season: यंदा पाऊस कमीच पडणार, हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकरी चिंतेत

मुंबई : भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनबाबत सुधारित अंदाज जाहीर करत देशभरात सरासरीच्या सुमारे ९० टक्के

'परिमाच'चे ३ हजार कोटी रुपयांचे ऑनलाइन बेटिंग सिंडिकेट उघडकीस

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सायप्रस येथील अवैध बेटिंग प्लॅटफॉर्म 'परिमाच'च्या विरोधात सहा

Critical mineral : भारतासह ३० देशांची खनिजांसाठी मोठी रणनीती

२० अब्ज डॉलरच्या मदतीने सुरक्षित सप्लाय चेन उभारणार चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी भारत सक्रिय नवी दिल्ली :