पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने बॅरियर ओलांडत थेट मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गामध्ये प्रवेश केला. बॅरियर ओलांडल्यावर हा ट्रक समोरून येणाऱ्या चारचाकीवर उलटला. हा धडक इतकी जबरदस्त होती की चारचाकीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात  दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.



या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी चारचाकीमधील चालकाचा समावेश आहे. तर चारचाकीमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील हा अपघात कामशेत येथे पुणे लेनवर पहाटे सुमार चार वाजता झाला.


दरम्यान, अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर तब्बल दहा किलोमीटर लांबीची वाहनरांग लागली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा