महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत पुढे ढकलली, पुढील आठवड्यात जाहीर केली जाणार तारीख

मुंबई (खास प्रतिनिधी): जाहीर करण्यात आलेल्या ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी २० नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. परंतु ही लॉटरी तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील आठवड्यात सोडत काढण्याचे निश्चित पालिकेने केले आहे. मात्र ही सोडत अनिश्चित काळासाठी स्थगित केली असली तरी सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. या सर्व घरांसाठी २०३७ जणांनी अर्ज भरले आहेत.



विकास नियंत्रण नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अंतर्गत ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील प्रकल्प राबवणाऱ्या विकासकांडून महापालिकेला प्रिमियमच्या बदल्यात घरे द्यावी लागतात. ताब्यात आलेल्या घरांपैंकी ४२६ घरांची सोडत काढून विक्री करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. महापालिकेकडून प्रथमच म्हाडाच्या धर्तीवर लॉटरी काढून अर्ज प्रक्रिया १४ नोव्हेंबरला पूर्ण झाल्यानंतर २० नोव्हेंबला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सोडत काढण्याचे निश्चित केले होते. परंतु ही सोडत आता पुढे ढकलण्यात आली आहे.


यासाठी घरे महागडी असतानाही २०३७ अर्ज प्राप्त झाले. आता पुढील आठवड्यात सोडत काढण्याचे पालिकेने निश्चित केले असले तरी पुढील आठवड्यात सोडतीची तारीख जाहीर केली जाणार आहे, असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे



कोणत्या ठिकाणी किती अर्ज


प्रेस्टिज भायखळा – ४२ घरांसाठी ११२ अर्ज


एलबीएस मार्ग भांडूप (प) – २४० घरांसाठी १२९ अर्ज


१६/ए मरोळ- अंधेरी (पू) – १४ घरांसाठी ९३७ अर्ज


माजासगाव, जोगेश्वरी (पू) – ४६ घरांसाठी ३९३ अर्ज



त्रिलोक पार्क, कांदिवली (प) – ४ घरांसाठी ८३ अर्ज


स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पू) – १९ घरांसाठी १८९ अर्ज


कांदिवली (प) – ३० घरांसाठी ११५ अर्ज


कांजूर -आदि अल्लूर – २७ घरांसाठी ५५ अर्ज


सागर वैभव सोसायटी कांदिवली – ४ घरांसाठी २४ अर्ज

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून