चालकाला हृदयविकाराचा झटका आणि अंबरनाथमध्ये घडला थरकाप उडवणारा अपघात!

ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर ही अपघाताची दुर्घटना घडली. ज्यात एका भरधाव चारचाकीने अनेक वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की एकजण थेट ब्रिजच्यावरून खाली कोसळला. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ही चारचाकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या महिला उमेदवार किरण चौबेंची होती.  चारचाकीमधून त्या एका सभेसाठी जात असताना हा अपघात घडला असून जखमींमध्ये त्यांचाही समावेश आहे. तर मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये चारचाकी चालक आणि दुचाकींवरील तीन जण अशा चौघांचा समावेश आहे.


पोलिसांना दिलेल्या जबाबात किरण चौबे म्हणाल्या की, गाडी पुलावरून जात असताना चालक लक्ष्मण शिंदे यांना एक फोन आला. फोनवर बोलत असतानाच अचानक त्यांनी बोलणे थांबवले. यानंतर चौबेंना दिसले की, शिंदेंचा पाय अॅक्सिलरेटरवर जोरदार दाबला गेला आणि गाडी अनियंत्रित होऊन वेगाने पुढे जातच क्षणार्धातच अपघात झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात चारचाकी चालक लक्ष्मण शिंदे यांच्यासह दुचाकीवरील ४५ वर्षीय शैलेश जाधव आणि ५७ वर्षीय चंद्रकांत अनारके यांचा मृत्यू झाला. हे दोघेही जण अंबरनाथ महापालिका कर्मचारी आहेत. तर १७ वर्षीय सुमीत चेलानी यालाही अपघातात प्राण गमवावे लागले. संबंधित घटना पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे अपघाताचे तपशील समजण्यात मदत झाली. मात्र या व्हिडीओमुळे थरकाप उडाला आहे. या घटनेतील जखमींवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयातही उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी 'विनामूल्य'!

मुंबई : राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त'

दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू

दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना

IND vs BAN: भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाला कॅप्टन

दोहा : भारताचा (भारत अ) आशिया कप रायझिंग कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. हा सामना जिंकून

कांदिवलीच्या चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा

मंत्री मंगलप्रभात लोढांना आमदार अस्लम शेखांनी दिली धमकी

मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई