Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात आज शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, काहीजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही क्रुझर जीप सोलापूरहून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाली होती. क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद (Solapur Hyderabad Highway) महामार्गावरून जात असताना, धाराशिवमधील (Dharashiv news) अणदूर परिसरामध्ये त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या या जीपने एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय गाडीतील इतर काही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टायर्स फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे हे या भीषण अपघाताचे प्राथमिक कारण मानले जात आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातल्याने अणदूर आणि सोलापूर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.



भीषण अपघातात तीन महिलांसह ५ जणांचा मृत्यू


सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिवजवळ झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सोलापूरहून नळदुर्ग येथील देवदर्शनासाठी निघालेली ही क्रुझर जीप टायर्स फुटल्यामुळे अनियंत्रित झाली आणि तिने रस्त्यावरील एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, क्रुझर गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून बसवले होते, ज्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली आणि जीवितहानी अधिक झाली. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी जीवावर उदार होऊन जोर लावून क्रुझर गाडी सरळ केली आणि आत अडकलेले मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. अपघातातील सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत आणि जखमी झालेले सर्व प्रवासी हे दक्षिण उळे सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समजते. सध्या अपघातस्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य आणि पंचनामा सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने झालेली ही मोठी दुर्घटना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह