निवडणुकीपूर्वीच भाजपने उधळला विजयाचा गुलाल! २४६ नगरपरिषदांपैकी १०० जागांवर बिनविरोध कमळ फुलले

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज देखील भरले आहेत. तर १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख होती. या दिवसात अनेक उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीची रिंगणात मतदानापूर्वीच भाजपने नगरसेवकांचे शतक पूर्ण केले आहे. याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे.



भाजपचे बिनविरोध जिंकलेले नगरसेवक – १००


भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष – ३


कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध?


- कोकण-४


- उत्तर महाराष्ट्र-४९


- पश्चिम महाराष्ट्र-४१


- मराठवाडा-३


- विदर्भ-३



दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे २६ नगरसेवक बिनविरोध


धुळ्यातील दोंडाई नगरपालिकेत नगराध्यक्षसह भाजपचे एकूण सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्याच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.



जामनेर नगरपालिकेत भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध


जळगावच्या जामनेर नगरपालिकेतही भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून यावर्षी देखील विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.



राज्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. दरम्यान अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील