चालकाला हृदयविकाराचा झटका आणि अंबरनाथमध्ये घडला थरकाप उडवणारा अपघात!

ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर ही अपघाताची दुर्घटना घडली. ज्यात एका भरधाव चारचाकीने अनेक वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की एकजण थेट ब्रिजच्यावरून खाली कोसळला. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ही चारचाकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या महिला उमेदवार किरण चौबेंची होती.  चारचाकीमधून त्या एका सभेसाठी जात असताना हा अपघात घडला असून जखमींमध्ये त्यांचाही समावेश आहे. तर मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये चारचाकी चालक आणि दुचाकींवरील तीन जण अशा चौघांचा समावेश आहे.


पोलिसांना दिलेल्या जबाबात किरण चौबे म्हणाल्या की, गाडी पुलावरून जात असताना चालक लक्ष्मण शिंदे यांना एक फोन आला. फोनवर बोलत असतानाच अचानक त्यांनी बोलणे थांबवले. यानंतर चौबेंना दिसले की, शिंदेंचा पाय अॅक्सिलरेटरवर जोरदार दाबला गेला आणि गाडी अनियंत्रित होऊन वेगाने पुढे जातच क्षणार्धातच अपघात झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात चारचाकी चालक लक्ष्मण शिंदे यांच्यासह दुचाकीवरील ४५ वर्षीय शैलेश जाधव आणि ५७ वर्षीय चंद्रकांत अनारके यांचा मृत्यू झाला. हे दोघेही जण अंबरनाथ महापालिका कर्मचारी आहेत. तर १७ वर्षीय सुमीत चेलानी यालाही अपघातात प्राण गमवावे लागले. संबंधित घटना पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे अपघाताचे तपशील समजण्यात मदत झाली. मात्र या व्हिडीओमुळे थरकाप उडाला आहे. या घटनेतील जखमींवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयातही उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar : उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात गोळीबार

उल्हासनगर : शहरातील कैलास कॉलनी चौक परिसरात गुरुवारी रात्री अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ

UPSC च्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) वर्ष २०२७ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

भारतात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार अमेरिका

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्यामध्ये आगामी काळात "मोठ्या घडामोडी" घडणार असल्याचे

शुभम खैरनारची पुण्यात सीबीआयकडून सखोल चौकशी

पुणे : 'नीट' पेपरफुटी प्रकरणात नाशिक येथून अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी शुभम खैरनार याला सीबीआयने पुण्यात आणले

India exposed Pakistan : भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची लायकी काढली

संयुक्त राष्ट्रे : ज्या देशाचा स्वतःचा इतिहास नरसंहाराने कलंकित आहे, अशा पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत