मेट्रो-११ मार्गिकेला मंजुरी

वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास होणार सुलभ


मुंबई  : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होण्यासाठी सरकारने मेट्रो ११ ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. मेट्रो लाइन ११ ही वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत असणार आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडीही सुटणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या मेट्रो लाइन ११ साठी २३,४८७.५१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये मेट्रो डेपो तयार करण्याचाही समावेश असणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे. मेट्रो लाइन ११ ही मेट्रो ४/ ४ ए चा विस्तार आहे. ही १७.५१ किलोमीटर लांब असणार आहे. या मार्गात १३ भूमिगत व १ अॅट ग्रेड स्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतली आहे.


ही मेट्रो मार्गिका वडाळा, शिवडी, फिरोजशाह मेहता रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि काळा घोडा मार्गे गेट वे ऑफ इंडियाकडे जाणार आहे. संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत आहे. काही वर्षात संपूर्ण मुंबईत तुम्हाला मेट्रोने प्रवास करता येणार आहे. ही नवीन मेट्रो लाइन ११ दक्षिण मुंबईसाठी गेम चेंजर ठरणार आहे. सध्या वडाळ्याहून कुलाबा आणि गेट वे ऑफ इंडियाला पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे खूप वेळ वाया जातो. या नवीन मेट्रो लाइमुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र