मेट्रो-११ मार्गिकेला मंजुरी

वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास होणार सुलभ


मुंबई  : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होण्यासाठी सरकारने मेट्रो ११ ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. मेट्रो लाइन ११ ही वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत असणार आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडीही सुटणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या मेट्रो लाइन ११ साठी २३,४८७.५१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये मेट्रो डेपो तयार करण्याचाही समावेश असणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे. मेट्रो लाइन ११ ही मेट्रो ४/ ४ ए चा विस्तार आहे. ही १७.५१ किलोमीटर लांब असणार आहे. या मार्गात १३ भूमिगत व १ अॅट ग्रेड स्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतली आहे.


ही मेट्रो मार्गिका वडाळा, शिवडी, फिरोजशाह मेहता रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि काळा घोडा मार्गे गेट वे ऑफ इंडियाकडे जाणार आहे. संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत आहे. काही वर्षात संपूर्ण मुंबईत तुम्हाला मेट्रोने प्रवास करता येणार आहे. ही नवीन मेट्रो लाइन ११ दक्षिण मुंबईसाठी गेम चेंजर ठरणार आहे. सध्या वडाळ्याहून कुलाबा आणि गेट वे ऑफ इंडियाला पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे खूप वेळ वाया जातो. या नवीन मेट्रो लाइमुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे