मेट्रो-११ मार्गिकेला मंजुरी

वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास होणार सुलभ


मुंबई  : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होण्यासाठी सरकारने मेट्रो ११ ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. मेट्रो लाइन ११ ही वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत असणार आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडीही सुटणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या मेट्रो लाइन ११ साठी २३,४८७.५१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये मेट्रो डेपो तयार करण्याचाही समावेश असणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे. मेट्रो लाइन ११ ही मेट्रो ४/ ४ ए चा विस्तार आहे. ही १७.५१ किलोमीटर लांब असणार आहे. या मार्गात १३ भूमिगत व १ अॅट ग्रेड स्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतली आहे.


ही मेट्रो मार्गिका वडाळा, शिवडी, फिरोजशाह मेहता रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि काळा घोडा मार्गे गेट वे ऑफ इंडियाकडे जाणार आहे. संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत आहे. काही वर्षात संपूर्ण मुंबईत तुम्हाला मेट्रोने प्रवास करता येणार आहे. ही नवीन मेट्रो लाइन ११ दक्षिण मुंबईसाठी गेम चेंजर ठरणार आहे. सध्या वडाळ्याहून कुलाबा आणि गेट वे ऑफ इंडियाला पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे खूप वेळ वाया जातो. या नवीन मेट्रो लाइमुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध