IND vs BAN: भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाला कॅप्टन

दोहा : भारताचा (भारत अ) आशिया कप रायझिंग कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. हा सामना जिंकून बांगलादेशचा संघ (बांगलादेश अ) अंतिम फेरीत पोहोचला. उपांत्य फेरीचा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. पण भारतीय कर्णधाराने हिरो बनण्यासाठी सुपर ओव्हरमध्ये केलेली चूक टीम इंडियाला भोवली.


भारताला विजयासाठी एका चेंडूंत चार धावांची गरज होती. त्यावेळी भारताच्या हर्ष दुबेने चेंडू फटकावला आणि तीन धावा धावून काढल्या. यामुळे दोन्ही संघांची धावसंख्या २० षटकांच्या अखेरीस १९४ अशी झाली. यामुळे नियमानुसार सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. भारताची सुपर ओव्हरमध्ये पहिली फलंदाजी होती. यावेळी भारताच्या संघात वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या आणि नेहाल वढेरा हे चांगल्या फॉर्मात दिसत होते. त्यामुळे हे तिघे भारताक़डून फलंदाजीला येतील, असे वाटत होते. पण सुपर ओव्हरमध्ये भारताचा कर्णधार जितेश शर्मा हा फलंदाजीसाठी आला. जितेशने काहीही विचार न करता स्ट्राइकही घेतली. पहिल्याच चेंडूवर तो स्कुपचा फटका मारण्यासाठी गेला आणि क्लीन बोल्ड झाला. हिरो बनण्याच्या प्रयत्नात कर्णधार जितेश शर्मा झिरो झाला. या विकेटमुळे भारतीय संघ एकदम दबावात आला. नंतर भारताकडून सूर्यवंशी ऐवजी आशुतोषला पाठवण्यात आले. तो झेलबाद झाला. लागोपाठ दोन्ही फलंदाज रिपॉनच्या चेंडूवर बाद झाले. यानंतर बांगलादेशची फलंदाजी सुरू झाली. सुपर ओव्हरमध्ये भारताचा पहिला डाव शून्यावर आटोपला होता. पण बांगलादेशला विजयासाठी आवश्यक एक धाव मिळवताना एक विकेट गमवावी लागली. सुयश शर्माच्या चेंडूवर यासिर अली झेलबाद झाला. रमनदीप सिंहने अत्यंत हुशारीने झेल घेतला. नंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अली मैदानात आला. यानंतर सुयशने गुगली टाकला पण तो लेगला एकदम खाली गेला. पंचांनी 'वाईड' असा निर्णय दिला. जेव्हा चेंडू वाईड गेला त्यावेळी बांगलादेशच्या फलंदाजाला यष्टीचीत करण्याची संधी होती. पण भारतीय यष्टीरक्षकाने चेंडू व्यवस्थित पकडला नाही आणि संधी गमावली. वाईडची धाव मिळाल्यामुळे बांगलादेशचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला. या विजयामुळे बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत पोहोचला.


याआधी नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करुन वीस षटकांत सहा बाद १९४ धावा केल्या तर भारताने धावांचा पाठलाग करताना वीस षटकांत सहा बाद १९४ धावा केल्या. यानंतर सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपले.

Comments
Add Comment

अखेर तो गोड क्षण आलाच! आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मानधना अव्वल स्थानावर

नवी दिल्ली: भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत पलाश मुच्छलसोबत लग्न

आयपीएल मिनी लिलावात कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी

IPL Auction 2026 LIVE : आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं आत्तापर्यंत कोणत्या खेळाडूला खरेदी केलं आहे ते पाहूया CSK : 

IPL मिनी लिलाव, कॅमरून ग्रीनचा २५.२० कोटींमध्ये KKRमध्ये समावेश

अबुधाबी : आयपीएल २०२६ साठी अबुधाबी येथे सुरू असलेल्या मिनी लिलावात क्रिकेटपटूंच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बोली

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला