सोसायटीच्या परवानगीविना विकासकाला मजला वाढविण्याची परवानगी

बांधकाम परवानगी रद्द करण्याची रहिवाशांची मागणी


कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली पालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. कल्याण, प.येथील नीरज रीवेरीया शंतनू कॉ. ऑप. हौसिंग सोसायटीच्या परवानगीशिवायच पालिकेने विकासकाला या इमारतीवर आणखी एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. २०१७ साली सहा मजले बांधून पूर्ण झालेली इमारत अवघ्या ८ वर्षांत कमकुवत झाली. असे असताना आणखी एक मजला वाढविण्यासाठी दिलेली परवानगी रहिवाशांसाठी धोकायदायक असून बांधकाम करताना एखादी दुर्घटना घडल्यास जवाबदारी केडीएमसी घेणार का असा प्रश्न करत केडीएमसीने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. विकासक पोलिसांचे दबाबतंत्र वापरत आहे.


कल्याण, प. येथील गोदरेज हिल परिसरात ही सोसायटी आहे. २०१७ साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तेथे लोक राहण्यास आले. आता या इमारतीला जवळपास ८ वर्षे पूर्ण झाली. इमारत कमकुवत होऊन दरवाजाच्या चौकटी निघत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अशी परिस्थिती असताना विकासकाने आणखी एक मजला बांधण्यासाठी केडीएमसीकडे परवानगी मागितली. मात्र सोसायटीची परवानगी नसताना, सोसायटीची 'ना हरकत प्रमाणपत्र' नसतानादेखील केडीएमसीने पाचवा मजला अधिक सातवा मजला असा एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या रहिवाशांनी केडीएमसीच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.


विशेष म्हणजे विकासकाने पाचव्या मजल्याचे यापूर्वी संपूर्ण बांधकाम केले असतानादेखील पाचव्या मजल्याची परवानगी देण्यात आली. तत्कालीन आयुक्त विजय सूर्यवंशी, नगररचनाकार सावंत यांनी जोपर्यंत सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत बांधकाम परवानगी देणार नाही अशी मौखीक व लेखी आदेश संबंधी नस्तीमध्ये नमूद असताना केडीएमसीकडून परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. ही सोसायटी नोंदणीकृत असतानाही विकासकाने कागदपत्रे, खोटा ना हरकत दाखला देऊन केडीएमसीची दिशाभूल केल्याचा आरोप सोसायटीच्या सचिव रेश्मा बांगर यांनी केला आहे. याबाबत केडीएमसी आयुक्तांचीदेखील या रहिवाशांनी भेट घेतली मात्र आयुक्तांनी याबाबत माहिती घेऊन सांगू असे उत्तर देत नगररचना विभागाकडे जाण्यास सांगितले. मात्र नगररचना विभाग आपल्या परवानगीवर ठाम आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये