सोसायटीच्या परवानगीविना विकासकाला मजला वाढविण्याची परवानगी

बांधकाम परवानगी रद्द करण्याची रहिवाशांची मागणी


कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली पालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. कल्याण, प.येथील नीरज रीवेरीया शंतनू कॉ. ऑप. हौसिंग सोसायटीच्या परवानगीशिवायच पालिकेने विकासकाला या इमारतीवर आणखी एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. २०१७ साली सहा मजले बांधून पूर्ण झालेली इमारत अवघ्या ८ वर्षांत कमकुवत झाली. असे असताना आणखी एक मजला वाढविण्यासाठी दिलेली परवानगी रहिवाशांसाठी धोकायदायक असून बांधकाम करताना एखादी दुर्घटना घडल्यास जवाबदारी केडीएमसी घेणार का असा प्रश्न करत केडीएमसीने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. विकासक पोलिसांचे दबाबतंत्र वापरत आहे.


कल्याण, प. येथील गोदरेज हिल परिसरात ही सोसायटी आहे. २०१७ साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तेथे लोक राहण्यास आले. आता या इमारतीला जवळपास ८ वर्षे पूर्ण झाली. इमारत कमकुवत होऊन दरवाजाच्या चौकटी निघत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अशी परिस्थिती असताना विकासकाने आणखी एक मजला बांधण्यासाठी केडीएमसीकडे परवानगी मागितली. मात्र सोसायटीची परवानगी नसताना, सोसायटीची 'ना हरकत प्रमाणपत्र' नसतानादेखील केडीएमसीने पाचवा मजला अधिक सातवा मजला असा एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या रहिवाशांनी केडीएमसीच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.


विशेष म्हणजे विकासकाने पाचव्या मजल्याचे यापूर्वी संपूर्ण बांधकाम केले असतानादेखील पाचव्या मजल्याची परवानगी देण्यात आली. तत्कालीन आयुक्त विजय सूर्यवंशी, नगररचनाकार सावंत यांनी जोपर्यंत सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत बांधकाम परवानगी देणार नाही अशी मौखीक व लेखी आदेश संबंधी नस्तीमध्ये नमूद असताना केडीएमसीकडून परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. ही सोसायटी नोंदणीकृत असतानाही विकासकाने कागदपत्रे, खोटा ना हरकत दाखला देऊन केडीएमसीची दिशाभूल केल्याचा आरोप सोसायटीच्या सचिव रेश्मा बांगर यांनी केला आहे. याबाबत केडीएमसी आयुक्तांचीदेखील या रहिवाशांनी भेट घेतली मात्र आयुक्तांनी याबाबत माहिती घेऊन सांगू असे उत्तर देत नगररचना विभागाकडे जाण्यास सांगितले. मात्र नगररचना विभाग आपल्या परवानगीवर ठाम आहे.

Comments
Add Comment

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या

ठाणे रुग्णालयाच्या पाडकामात आढळली शेकडो वर्षे दडलेली शिल्पकला

कोरीव प्रतिमा असलेल्या प्राचीन शिल्पांनी सर्वसामान्यांत उत्सुकता ठाणे : इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या

बदलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बदलापूर  : ''माझ्या नेत्याला जर कोणत्या पदावरून राजीनामा द्यावा लागत असेल, तर त्यांच्या सन्मानार्थ मीसुद्धा

ये पब्लिक है, सब जानती है!

केडीएमसीच्या महापौरपदावर खा. श्रीकांत शिंदे यांचे उत्तर कल्याण  : ''ये पब्लिक है, सब जानती है. कुणीही काहीही बोलो,

ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी