मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

रत्नागिरी : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. आयोगाने ही घोषणा करुन काही दिवस होत नाहीत तोच राज्यातील एका गावाने मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. गावात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट उपलब्ध नाही. यामुळे २१ व्या शतकाला अनुसरुन दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. जगाशी संपर्क ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी तक्रार करुन ग्रामस्थांनी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट द्या मगच मत मिळवा, अशी ठाम भूमिका तळवडेतल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. नो नेटवर्क, नो एंट्री अशी ठाम भूमिका तळवडेतल्या ग्रामस्थांनी घेतली आहे.गावकऱ्यांच्या भूमिकेला राजकीय पक्षांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर ; म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

'तरूणांसाठी' पोकोचा नवा C85 5G स्मार्टफोन बाजारात लॉच

मुंबई: व्हॅल्यू फॉर मनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोको (POCO) ब्रँड हा तरुणाईला नेहमीच भावतो. अशातच कंपनीने आपल्या

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा