हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रीजिजू हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या सदस्यांची बैठक घेणार आहेत. मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्राद्वारे बैठकीसाठी आमंत्रण दिले असून ही बैठक सोमवारी, ही सर्वपक्षीय बैठक, २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता, नवी दिल्लीत संसद भवन ॲनेक्स या इमारतीच्या मुख्य समिती कक्षात होईल. संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.


संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू होईल आणि सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यक गरजांनुसार, अधिवेशन २० डिसेंबर २०२४ रोजी संपणार आहे. २६ डिसेंबर २०२४ रोजी असलेला संविधान दिन साजरा करण्याच्या निमित्ताने, लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही


तसंच केंद्र सरकार या अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकांची माहितीही विरोधकांना देणार आहे. याशिवाय हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सहकार्याचं आवाहनही केंद्र सरकार करणार आहे.या बैठकीत आगामी अधिवेशनात चर्चेसाठी येणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून दोन्ही सभागृहांचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावे यासाठी सरकार एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी संसदेत एक देश, एक निवडणूक यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.


हिवाळी अधिवेशनात कायदेविषयक कामे वेळेत पूर्ण व्हावीत, चर्चा अधिक परिणामकारक व्हावी आणि विरोधकांसोबत समन्वय साधून सत्र व्यवस्थित चालावे, यासाठी ही सर्वपक्षीय बैठक महत्त्वाची ठरणार आहे.


Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या